शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:07 AM

वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही.

नवी दिल्ली : वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. परंतु अलीकडे या जमीनीचे वाटप भूमिहीन व लोकाभिमुख उपक्रमाला न देता धनदांडग्यांना व शिक्षण संस्थांना वितरित केली आहे. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आज वर्ध्याचे रामदास तडस (भाजपा) यांनी लोकसभेत शून्य प्रहरात लावून धरली.रामदार तडस म्हणाले, की अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांनी संगनमताने या जमिनी श्रीमंत, बिल्डर व संस्थांना विकल्या आहेत. विनोबांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा सेवाग्राममधून ७ मार्च १९५१ ला व आंध्रातील शिवरामपल्ली म्हणजे आजच्या तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्लीमधून केला. त्यांनी श्रीमंतांना जमिनीचा काही भाग भूमिहीनांना देण्याचे आवाहन केले.आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओडिशा व महाराष्ट्र या राज्यांत ते पायी फिरले. त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु सरकारी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्था यांनी भ्रष्टाचार करून स्वत:च्या फायद्याकरिता जमिनीचा उपयोग केला. त्यामुळे भूदानातून मिळालेल्या जमिनीच्या वाटपातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग