शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:57 IST

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा केंद्र सरकारवर आरोप

नवी दिल्ली : राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (इडी) यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सोमवारी राज्यसभेत केला.सभागृहात शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात दहशत, भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, महसुल गुप्तचर यंत्रणा, इडी यांच्याकडून वेगवेगळे एफआयआर नोंदविले जात आहेत. त्याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे. राजकीय सुड घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होता कामा नये. भ्रष्टाचार करण्यासाठी केलेली कृती व तसे करण्यासाठी घेतलेला अधिकृत निर्णय या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. हा फरक घ्यायला हवा.काही लोकांना अडकविण्यासाठी त्यांनी दिलेल्या जबाबाचा हवा तसा अर्थ तपास यंत्रणा काढत आहेत, असा आरोप शर्मा यांनी केला.भाजपा खासदारांकडून जोरदार निषेधहे सांगताना आनंद शर्मा यांनी कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख करणे मात्र टाळले. मात्र त्यांच्या या उद्गारांचा भाजप खासदारांनी जोरदार निषेध केला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले की, शर्मा हे तपास यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्यावर अन्याय होत आहे असे ज्यांना वाटते त्यांना त्याविरोधात दाद मागण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. असे असून देखील आनंद शर्मा तपासयंत्रणांचे खच्चीकरण का करत आहेत, अशी विचारणा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही केली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस