शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:22 IST

Caste-Wise Census: भाजपने जातीय जनगणनेचा निर्णय घेतला असून, काँग्रेसने त्याचे स्वागत केले आहे.

Caste-Wise Census: केंद्रातील मोदी सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून, यासाठी सरकारला समर्थन करण्याचे असल्याचे जाहीर केले. पण, यासोबतच त्यांनी सरकारकडे चार मागण्याही केल्या आहेत.

काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागतकाँग्रेस खासदार राहुल गांधी आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींनी जातीय जनगणनेची घोषणा अचानक का केली, माहित नाही. पण, त्यांनी हा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतोत. आम्हाला आता यासाठी एक कालमर्यादा हवी आहे. जातीय जनगणनेसाठी तेलंगणा एक आदर्श राज्य बनले आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी आम्ही सरकारला आमचा पाठिंबा देतो, असे राहुल यावेळी म्हणाले. 

ही पहिली पायरी, पुढे...राहुल गांधी पुढे म्हणाले, मी पुन्हा सांगू इच्छितो की, जातीय जनगणना ही पहिली पायरी आहे. जात जनगणनेद्वारे विकासाचे एक नवीन उदाहरण मांडण्याचे आमचे ध्येय आहे. फक्त आरक्षणच नाही, तर आम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की, या देशात ओबीसी, दलित आणि आदिवासींचा सहभाग किती आहे? हे जात जनगणनेद्वारे कळेल. पण आपल्याला जात जनगणनेच्या पलीकडे जावे लागेल. 

खासगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे

जातीय जनगणनेसाठी आम्ही केवळ सरकारवर दबाव आणला नाही, तर देशभरात एक व्यापक मोहीम देखील चालवली. पूर्वी नरेंद्र मोदी म्हणायचे की ,फक्त चार जाती आहेत, पण अचानक त्यांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली. आम्हाला जातीय जनगणनेद्वारे देशात विकासाचा एक नवीन मार्ग आणायचा आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, कलम 15(5) अंतर्गत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू केले जावे. आता आम्ही सरकारने ते त्वरित लागू करावे अशी मागणी करतो, असेही ते यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...

काँग्रेसच्या सरकारकडे चार मागण्या 

  1. राहुल गांधी म्हणाले की, सरकारने जातीची जनगणना कधी आणि कशी केली जाईल हे स्पष्टपणे सांगावे.
  2. सरकारने तेलंगणासारखे जात सर्वेक्षण मॉडेल स्वीकारावे, जे जलद, पारदर्शक आणि समावेशक आहे.
  3. जातीच्या आकडेवारीच्या आधारे 50% आरक्षण मर्यादा काढून टाकणे आवश्यक आहे.
  4. सरकारी संस्थांप्रमाणे खाजगी संस्थांमध्येही आरक्षण लागू केले पाहिजे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस