शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

आधी पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा केला, खटला दाखल होताच म्हणाले- 'माफ करा, आमचं करिअर खराब होईल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 18:35 IST

जम्मू-काश्मीर पोलिसांनी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

श्रीनगर: T-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननेभारताचा पराभव केला. यानंतर भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा केल्याच्या घटना घडल्या. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याबद्दल दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली(UAPA) कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. 

रविवारी दुबईत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर सौरा यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांच्या कृत्याचे समर्थन नाही, पण...दरम्यान, जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मानवतावादी आधारावर UAPA अंतर्गत केलेले आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करत नाहीत. पण, ही शिक्षा त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. यामुळे मुलांचे भविष्य खराब होऊ शकते. तसेच, युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते, नासेर खुहेमी यांनी एका निवेदनात म्हटले की, UAPA अंतर्गत विद्यार्थ्यांवरील आरोप कठोर शिक्षा आहेत. यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होईल आणि ते कट्टरावादाकडे वळतील. या आरोपांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि करिअरवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतकी कठोर शिक्षा देऊ नये. 

'फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय नाही'हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना पाकिस्तानच्या विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा करत फटाके फोडणाऱ्यांचा भारतीय डीएनए असू शकत नाही. आपल्याच देशात दडलेल्या देशद्रोहींपासून सावध राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१Pakistanपाकिस्तानIndiaभारतStudentविद्यार्थी