शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

मुद्द्याची गोष्ट : संकटांच्या निखाऱ्यांवर तेजाळलेल्या इंदिरा गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 2:30 PM

व्ही. व्ही. गिरी जिंकल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या आगीत तेलच ओतले गेले. शिस्तभंगाची कारवाई करून इंदिरा गांधी यांना पक्षातूनच हाकलले. मात्र या यातून त्या सहीसलामत बाहेर पडल्या

कृष्णप्रताप सिंह, ज्येष्ठ पत्रकार

श्रीमती इंदिरा गांधी यांनी जनता पार्टीत फूट पाडली, मोरारजी सरकार पाडून काँग्रेसच्या पाठिंब्यावरील चौधरी चरणसिंग यांचे सरकार बनवले, नंतर त्यांना लोकसभेचे तोंडही पाहू न देता मध्यावधी निवडणुकांद्वारे पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणून पंतप्रधान पद मिळविले. इंदिरा गांधी यांच्या या धडाडीत आजच्या काँग्रेससाठी अनेक मोठे धडे आहेत. सर्वांत मोठा धडा हा आहे की, राजकारण हे रणनीतीचे युद्ध आहे आणि युद्ध कधीही कमजोर घोड्यावर बसून जिंकले जाऊ शकत नाही.

णत्याही मोठ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही संकटाच्या काळातच होते, असे म्हटले जाते. ‘लोह महिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना ही कसोटी लावल्यास आढळते की, एकाच वेळी अनेक संकटांचा सामना केल्याने पंतप्रधानपद हे त्यांच्यासाठी काटेरी मुकुट ठरले होते. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या आणि पुढच्याच वर्षी, १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊन काँग्रेसच्या जागा घटल्या. त्यामुळे त्यांच्यासमोरील संकटात वाढ झाली. १९६९ पर्यंत पक्षातील अंतर्गत संघर्ष इतका विकोपाला गेला की, विभाजनाची स्थिती निर्माण झाली. त्यातच राष्ट्रपतीपदाची निवडणूक आली. इंदिरा गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष व्ही. व्ही. गिरी यांना समर्थन दिले. ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा’, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. व्ही. व्ही. गिरी जिंकल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या आगीत तेलच ओतले गेले. शिस्तभंगाची कारवाई करून इंदिरा गांधी यांना पक्षातूनच हाकलले. मात्र या यातून त्या सहीसलामत बाहेर पडल्या. त्यांनी सरकार वाचवलेच पण, १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे बंद करण्यासारखे धाडसी निर्णय घेतले. नंतर ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन त्यांनी १९७१ मध्ये नवीन काँग्रेसच्या ध्वजाखाली मुदतपूर्व निवडणुका घेतल्या व विजय प्राप्त केला. ‘रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत राष्ट्र मजबूत करण्याची महत्त्वाकांक्षा असणारी लोह महिला’ अशी आपली प्रतिमा त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. १९७५ मध्ये रायबरेली लोकसभा मतदारसंघातील त्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर त्यांनी आणीबाणी लावली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह नागरिकांचे सर्व मूलभूत हक्क गोठवले. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले. यांचा उल्लेख होताच आजही काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेला विजय आणि बांग्लादेशची निर्मिती यामुळे काँग्रेसला ‘संरक्षण’ही मिळते, हे विसरून चालणार नाही. नाराज मतदारांनी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सत्तेवरून हटवले. विरोधकांना वाटले की, काँग्रेस कायमचीच संपली आहे. मात्र, त्यांनी अवघ्या अडीच वर्षात सत्तेत पुनरागमन केले. बिहारातील बेल्छी गावात दलितांच्या नृशंस संहारानंतर पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी दाखवलेले अद्भूत साहस तसेच उत्तर प्रदेशच्या आजमगढ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आखलेली रणनीती यामुळे इंदिरा गांधी यांची सत्तेत परत येण्याची वाट सुकर केली. तेव्हा घडले असे होते की, मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येऊन अवघे काही महिनेच झाले असताना बिहारातील बेल्छी गावात १४ दलितांची हत्या करण्यात आली. पीडित परिवारांचे सांत्वन करण्यासाठी बेल्छी गावात पोहोचण्यासाठी इंदिरा गांधी यांनी आपले प्राणही संकटात घातले. श्रीमती गांधी यांचा बेल्छी दौरा ‘टर्निंग पॉइंट’  ठरला. परिवर्तनाची उरलेली पटकथा पुढील वर्षी एप्रिल-मे १९७८ मध्ये आजमगढ लोकसभा पोटनिवडणुकीत लिहिली गेली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. सर्व जागा जनता पार्टीने जिंकल्या होत्या. आजमगढचे खासदार रामनरेश यादव मुख्यमंत्री झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखली. 

जनता पार्टीने रामनरेश यादव यांच्याच जातीच्या रामवचन यादव यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय मोहसिना किडवाई यांना उमेदवारी दिली. मतदारांचा मूड बदललेला पाहून जनता पार्टीत खळबळ उडाली. काँग्रेसचा मार्ग रोखण्यासाठी वरिष्ठ नेते जाॅर्ज फर्नांडिस आजमगढला पोहोचले. त्यांनी १० दिवस तेथेच मुक्काम ठोकला. अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरणसिंग, राज नारायण आणि मधू लिमये ही नेतेमंडळीही आली. तरीही काँग्रेस ३५ हजारपेक्षा अधिक मतांनी विजयी झाली. उत्तर भारतातील मतदारांवरील जनता पार्टीची मोहिनी उतरत असल्याचे संकेत म्हणून या विजयाकडे पाहिले गेले. त्यानंतर इंदिरा गांधी पुनरागमनासाठी दुप्पट उत्साहाने कामाला लागल्या. त्यानंतर नोव्हेंबर १९७८ मध्ये चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी स्वत: पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे चिडलेल्या मोरारजी सरकारने त्यांना लोकसभेतून निलंबित केले. इतकेच नव्हे, तर त्यांना अटकही करण्यात आली. मात्र त्यामुळे सरकारचे हसेच झाले. त्याचा फायदा इंदिरा गांधी यांना झाला.

अनेक दिव्ये पार करून बेल्छीला पोहोचल्या इंदिराजी...१३ ऑगस्ट १९७७ रोजी इंदिरा गांधी  दिल्लीहून विमानाने पाटण्याला पोहोचल्या. बेल्छीला जाणे धोकादायक आहे, अशा सूचना मिळूनही त्या रवाना झाल्या. अत्यंत वाईट सडकेने मार्ग रोखला, तेव्हा त्या ट्रॅक्टरवर जाऊन बसल्या. रस्त्यात दुथडी भरून वाहणारी नदी लागली असता त्या बिना अंबारीच्या हत्तीच्या पाठीवर बसल्या व नदी पार केली. नंतर जवळपास कमरेएवढ्या पाण्यातून वाट काढत बेल्छी गाठले. त्या दलित परिवारांना भेटल्या, तेव्हा त्यांची स्थिती पाहून हे परिवारही गहिवरले. त्यांची साडी कमरेपर्यंत भिजलेली होती. दुसरी साडी मागवावी लागली. अत्यंत भावुक होऊन लोक त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला मत न देऊन आम्ही मोठी चूक केली आहे.’

 

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधी