शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अनिल अंबानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे २ अधिकारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:47 AM

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीने मे. एरिक्सन इंडिया प्रा. लि. या कंपनीस ५५० कोटी रुपये चुकते करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिला होता. त्याचे पालन केले नाही म्हणून एरिक्सन कंपनीने रिलायन्स व अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांना न्यायालयीन अवमाननेच्या (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) एका प्रकरणात जातीने हजर होण्याच्या दिलेल्या आदेशात फेरबदल केल्याबद्दल ‘कोर्ट मास्टर’ म्हणून काम करणाऱ्या मानव शर्मा व तपन कुमार चक्रवर्ती या सर्वोच्च न्यायालयातील दोन अधिका-यांना तडकापडकी बडतर्फ करण्यात आले आहे.अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीने मे. एरिक्सन इंडिया प्रा. लि. या कंपनीस ५५० कोटी रुपये चुकते करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिला होता. त्याचे पालन केले नाही म्हणून एरिक्सन कंपनीने रिलायन्स व अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. वितीन शरण यांच्या खंडपीठापुढे ७ जानेवारी रोजी सुनावणी झाली, तेव्हा रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष असलेल्या अनिल अंबानी यांनी १२ फेब्रुवारीस जातीने कोर्टात हजर राहावे, असा आदेश झाला होता. अंबानी यांना स्वत: हजर न राहण्याची मुभा द्यावी, ही त्यांच्या वकिलांनी केलेली विनंती अमान्य करून अंबानी यांना हजर व्हावेच लागेल, असे न्यायालयाने आवर्जून स्पष्ट केले होते.असे असूनही त्या दिवशी न्यायालयाच्या वेबसाइटवर जो आदेश अपलोड करण्यात आला, त्यात अंबानी यांना जातीने हजर न राहण्याची मुभा देण्यात आली आहे, असा उल्लेख केला गेला. अंबानी यांना न्यायालयाचे जे समन्स पाठविले गेले त्यातही तसाच उल्लेख होता.एरिक्सन कंपनीच्या वकिलाने ही बाब लक्षात आणून दिल्यावर खंडपीठाने १० जानेवारी रोजी सुधारित आदेशही काढला होता. त्यानुसार अंबानी १२ व १३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात जातीने हजर राहिले व युक्तिवाद पूर्ण झाल्यावर खंडपीठाने निकाल राखून ठेवला.का झाली कारवाई?‘कोर्ट मास्टर’ म्हणून काम करणारे शर्मा व चक्रवर्ती हे सहाय्यक निबंधक हुद्द्याचे अधिकारी आहेत. प्रकरणे सुनावणीसाठी पुकारणे व त्यांत काय कामकाज झाले व न्यायालयाने कोणते निर्देश दिले यांची ‘रेकॉर्ड आॅफ प्रोसीडिंग्ज’ (आरओपी) म्हणून नोंद करणे ही ‘कोर्ट मास्टर’ची जबाबदारी असते. हे ‘आरओपी’ रोजच्या रोज न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाते व न्यायालयाचे प्रशासनही त्यानुसारच पुढील कारवाई करत असते.अनिल अंबानी यांच्या प्रकरणात प्रत्यक्षात दिलेल्या आदेशाहून वेगळा आदेश कसा नोंदविला गेला, याची खातेनिहाय चौकशी करता या फेरफारास शर्मा व चक्रवर्ती जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी प्रशासकीय प्रमुख या नात्याने या दोन्ही अधिकाºयांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अन्वये अशी विनाचौकशी बडतर्फी करण्याचे अधिकार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय