शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:03 IST

नोएडात एका व्यावसायिकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Noida CEO Accident: नोएडामधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर कॅबने जाणाऱ्या नोएडाच्या एका व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू झाला. डीएनडी फ्लायओव्हरवर व्यावसायिकाची कॅब एका ट्रकला धडकली आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर बचावला आहे. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केला. व्यावसायिकाच्या कुटुंबाने उबर कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर ड्रायव्हरने टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

मृत व्यावसायिकाचे नाव ५९ वर्षीय राकेश कुमार असे आहे. ते नोएडा सेक्टर ३५ मधील गरिमा विहार येथे राहत होते. ते टेक्नोकॉन्सेप्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सीईओ होते. २१ जून रोजी पहाटे शनिवारी ही घटना घडली. राकेश यांना एका बिझनेस मीटिंगसाठी बंगळुरूला जायचे होते. म्हणून त्यांनी पहाटे ४ वाजता आयजीआय विमानतळावर पोहोचण्यासाठी उबरवरून कॅब बुक केली होती. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.

दिल्ली नोएडा डायरेक्ट (डीएनडी) उड्डाणपूलावरील टोल प्लाझाजवळ हा सगळा प्रकार घडला. प्रवास सुरु केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांची गाडी रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडी चालवताना चालकाला झोप लागली आणि हा अपघात झाला असा आरोप राकेश कुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने राकेश कुमार यांचे लोकेशन पाहिल्यानंतर त्यांना या अपघाताची माहिती मिळाली.

"सुरुवातीला काय झाले ते आम्हाला समजले नाही. माझ्या आईने वडिलांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मी त्यांचे लोकेशन पाहिलं. मला कळलं की ते अजूनही डीएनडी फ्लायओव्हरवर आहेत. आम्ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा टोलजवळ एका ट्रकच्या मागच्या बाजूला गाडी अडकलेली दिसली. तिथे जाऊन पाहिलं तेव्हा लोकांनी सांगितले की एक माणूस आत अडकला आहे. गाडीत माझे वडील होते, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असं राकेश कुमार यांच्या मुलीने सांगितले.

अपघातातून वाचलेल्या चालक सुधीरने सांगितले की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. पण राकेश कुमार यांच्या मुलीने म्हटलं की, "रस्त्याने जाणाऱ्यांनी मला सांगितले की चालकाने त्याला झोप आल्याचे मान्य केलं होतं. मी सर्व टायर्ससह गाडीचे फोटोही पोलिसांना पाठवले आहेत. अपघातानंतर उबरने आमच्याशी संपर्क साधला नाही. अॅपने कोणतेही स्पष्टीकरण न देता आयजीआय विमानतळावरून एम्स असे लास्ट लोकेशन दाखवले." अपघातानंतर काही तासांनी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास ड्रायव्हरने अॅप राईड संपल्याचे मार्क केले. जर चालक बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून होता तर कंपनीने याकडे लक्ष द्यायला हवं होतं असंही कुटुंबियांनी म्हटलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात