शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:03 IST

नोएडात एका व्यावसायिकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Noida CEO Accident: नोएडामधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर कॅबने जाणाऱ्या नोएडाच्या एका व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू झाला. डीएनडी फ्लायओव्हरवर व्यावसायिकाची कॅब एका ट्रकला धडकली आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर बचावला आहे. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केला. व्यावसायिकाच्या कुटुंबाने उबर कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर ड्रायव्हरने टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

मृत व्यावसायिकाचे नाव ५९ वर्षीय राकेश कुमार असे आहे. ते नोएडा सेक्टर ३५ मधील गरिमा विहार येथे राहत होते. ते टेक्नोकॉन्सेप्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सीईओ होते. २१ जून रोजी पहाटे शनिवारी ही घटना घडली. राकेश यांना एका बिझनेस मीटिंगसाठी बंगळुरूला जायचे होते. म्हणून त्यांनी पहाटे ४ वाजता आयजीआय विमानतळावर पोहोचण्यासाठी उबरवरून कॅब बुक केली होती. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.

दिल्ली नोएडा डायरेक्ट (डीएनडी) उड्डाणपूलावरील टोल प्लाझाजवळ हा सगळा प्रकार घडला. प्रवास सुरु केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांची गाडी रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडी चालवताना चालकाला झोप लागली आणि हा अपघात झाला असा आरोप राकेश कुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने राकेश कुमार यांचे लोकेशन पाहिल्यानंतर त्यांना या अपघाताची माहिती मिळाली.

"सुरुवातीला काय झाले ते आम्हाला समजले नाही. माझ्या आईने वडिलांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मी त्यांचे लोकेशन पाहिलं. मला कळलं की ते अजूनही डीएनडी फ्लायओव्हरवर आहेत. आम्ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा टोलजवळ एका ट्रकच्या मागच्या बाजूला गाडी अडकलेली दिसली. तिथे जाऊन पाहिलं तेव्हा लोकांनी सांगितले की एक माणूस आत अडकला आहे. गाडीत माझे वडील होते, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असं राकेश कुमार यांच्या मुलीने सांगितले.

अपघातातून वाचलेल्या चालक सुधीरने सांगितले की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. पण राकेश कुमार यांच्या मुलीने म्हटलं की, "रस्त्याने जाणाऱ्यांनी मला सांगितले की चालकाने त्याला झोप आल्याचे मान्य केलं होतं. मी सर्व टायर्ससह गाडीचे फोटोही पोलिसांना पाठवले आहेत. अपघातानंतर उबरने आमच्याशी संपर्क साधला नाही. अॅपने कोणतेही स्पष्टीकरण न देता आयजीआय विमानतळावरून एम्स असे लास्ट लोकेशन दाखवले." अपघातानंतर काही तासांनी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास ड्रायव्हरने अॅप राईड संपल्याचे मार्क केले. जर चालक बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून होता तर कंपनीने याकडे लक्ष द्यायला हवं होतं असंही कुटुंबियांनी म्हटलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात