शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:03 IST

नोएडात एका व्यावसायिकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Noida CEO Accident: नोएडामधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर कॅबने जाणाऱ्या नोएडाच्या एका व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू झाला. डीएनडी फ्लायओव्हरवर व्यावसायिकाची कॅब एका ट्रकला धडकली आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर बचावला आहे. ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केला. व्यावसायिकाच्या कुटुंबाने उबर कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर ड्रायव्हरने टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

मृत व्यावसायिकाचे नाव ५९ वर्षीय राकेश कुमार असे आहे. ते नोएडा सेक्टर ३५ मधील गरिमा विहार येथे राहत होते. ते टेक्नोकॉन्सेप्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे सीईओ होते. २१ जून रोजी पहाटे शनिवारी ही घटना घडली. राकेश यांना एका बिझनेस मीटिंगसाठी बंगळुरूला जायचे होते. म्हणून त्यांनी पहाटे ४ वाजता आयजीआय विमानतळावर पोहोचण्यासाठी उबरवरून कॅब बुक केली होती. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.

दिल्ली नोएडा डायरेक्ट (डीएनडी) उड्डाणपूलावरील टोल प्लाझाजवळ हा सगळा प्रकार घडला. प्रवास सुरु केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांची गाडी रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडी चालवताना चालकाला झोप लागली आणि हा अपघात झाला असा आरोप राकेश कुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने राकेश कुमार यांचे लोकेशन पाहिल्यानंतर त्यांना या अपघाताची माहिती मिळाली.

"सुरुवातीला काय झाले ते आम्हाला समजले नाही. माझ्या आईने वडिलांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. मी त्यांचे लोकेशन पाहिलं. मला कळलं की ते अजूनही डीएनडी फ्लायओव्हरवर आहेत. आम्ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा टोलजवळ एका ट्रकच्या मागच्या बाजूला गाडी अडकलेली दिसली. तिथे जाऊन पाहिलं तेव्हा लोकांनी सांगितले की एक माणूस आत अडकला आहे. गाडीत माझे वडील होते, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असं राकेश कुमार यांच्या मुलीने सांगितले.

अपघातातून वाचलेल्या चालक सुधीरने सांगितले की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. पण राकेश कुमार यांच्या मुलीने म्हटलं की, "रस्त्याने जाणाऱ्यांनी मला सांगितले की चालकाने त्याला झोप आल्याचे मान्य केलं होतं. मी सर्व टायर्ससह गाडीचे फोटोही पोलिसांना पाठवले आहेत. अपघातानंतर उबरने आमच्याशी संपर्क साधला नाही. अॅपने कोणतेही स्पष्टीकरण न देता आयजीआय विमानतळावरून एम्स असे लास्ट लोकेशन दाखवले." अपघातानंतर काही तासांनी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास ड्रायव्हरने अॅप राईड संपल्याचे मार्क केले. जर चालक बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून होता तर कंपनीने याकडे लक्ष द्यायला हवं होतं असंही कुटुंबियांनी म्हटलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात