शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

तामिळनाडूत कॅप्टन विजयकांत यांचा सत्ताधारी आघाडीला दे धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 1:20 AM

असिफ कुरणे -  चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत ...

असिफ कुरणे - 

चेन्नई : तामिळनाडूच्याराजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत निवडणुकीआधीच जोराचा धक्का दिला आहे. जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याने डीएमडीकेने हा निर्णय घेतला. तसेच राज्यात अण्णाद्रमुक उमेदवारांच्या पराभवासाठी पक्षाचे कार्यकर्ते काम करतील, असा इशारा डीएमडीकेचे उपसचिव के. एल. सुदीश यांनी दिला आहे. (Captain Vijayakant's push to the ruling front in Tamil Nadu!)तमिळनाडू निवडणुकीत सत्ताधारी अण्णाद्रमुक व विरोधी द्रमुकला आपल्या मित्रपक्षांना जागा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी पक्षांची संख्या दोन आकडी होत असल्यामुळे प्रत्येकाला त्यांंच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य होईना. त्यामुळे आघाड्यांमध्ये निवडणुकीआधीच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ‘एनडीए’मध्ये प्रमुख अण्णाद्रमुकसह भाजप (२०), पीएमके (२३) यांच्यात जागावाटप निश्चित झाले आहे; पण या दोन पक्षांपेक्षा कमी जागा मिळत असल्याने नाराज झालेल्या विजयकांत यांनी ‘एनडीए’तून फारकत घेतली.जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज एएमएमकेचे टीटीटी दिनकरन आणि एमआयएमचे औवेसी यांच्यात हातमिळवणी झाली असून, त्यापाठोपाठ विजयकांत यांनी एनडीएशी काडीमोड घेतल्याने तमिळनाडूत नवी समीकरणे तयार होत आहेत. जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज आहे.

‘एनडीए’तून बाहेर : अण्णाद्रमुक उमेदवारांचा पराभव करण्याचा इशारासन २०११ च्या निवडणुकीत २९ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या डीएमडीकेला आपली जादू कायम ठेवता आली नाही. असे असले तरी या पक्षाकडे अजूनही ८ ते १० टक्के वोटबँक आहे. उत्तर आणि दक्षिण तमिळनाडूमधील ४१ मतदारसंघांत आपले प्राबल्य असल्याचा सुदीश यांचा दावा आहे. 

उत्तर तमिळनाडूमधील जागावाटपावरून सत्ताधारी आघाडीत वाद असून, यातून तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याने डीएमडीकेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमडीके स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणElectionनिवडणूक