शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:25 IST

Pathankot helicopter crash: पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

नवी दिल्ली - पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. (Pathankot helicopter crash)त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने लष्कर आणि नौदलाची शोधमोहीम आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कॅप्टन जयंत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांमध्ये माझ्यातील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धनीने शोध घेतल्याने माझ्या मुलाचे पार्थिव पाण्यामध्ये कुसत आहे. (Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions)

पठाणकोटमधील मामून छावणीमधून ३ऑगस्ट रोजी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर रंजित सागर डॅम लेकमध्ये कोसळसले होते. तेव्हापासून पायलट आणि को पायलट लेफ्टिनंट कर्न अभित सिंह बाथ आणि कॅप्टन जयंत जोशी बेपत्ता झाले होते. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुमारे ८० मीटर आत गेले होते. 

दरम्यान, अमृतसरमधील रहिवासी असलेल्या लेफ्टिनंट कर्नल बाथ यांचे पार्थिव १५ ऑगस्ट रोजी जलाशयात सापडले होते. मात्र कॅप्टन जयंत जोश यांच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती अद्याप हाती लागलेली नाही. कॅप्टन जोशींचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये सेवेत आहे. तिने तिचा मुलगा राष्ट्राला समर्पित केला आहे.

दरम्यान, कॅप्टन जयंत यांचे मोठे भाऊ नील यांनीही शोधमोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शोधमोहीम लवकरात लवकर संपवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संरक्षण दलाची दोनमोठी हत्यारे लष्कर आणि नौदल शोधमोहिमेत गुंतले आहे. तरीही २० दिवसांनंतर आम्हाला हेलिकॉप्टरचे अवशेष आणि जयंतचा मृतदेह एका सरोवरातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहोत, ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. ही बाब या शोधमोहिमेवर अनेक प्रश्न उपस्थित करते. मात्र आम्हाला त्यात पडायचे नाही आहे.

कॅप्टन जयंतचे वडील म्हणाले की, गेल्या सात महिन्यांमध्ये रुद्र हेलिकॉप्टरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये स्क्वाड्रनच्या तीन पायलटांचा मृत्यू झाला आहे. तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. कदाचित आता त्याला पुन्हा उड्डाण करता येणार नाही. पायलट एक एक करून मरत आहेत. ही बाब चिंतेची आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPunjabपंजाबAccidentअपघात