शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:25 IST

Pathankot helicopter crash: पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

नवी दिल्ली - पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. (Pathankot helicopter crash)त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने लष्कर आणि नौदलाची शोधमोहीम आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कॅप्टन जयंत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांमध्ये माझ्यातील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धनीने शोध घेतल्याने माझ्या मुलाचे पार्थिव पाण्यामध्ये कुसत आहे. (Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions)

पठाणकोटमधील मामून छावणीमधून ३ऑगस्ट रोजी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर रंजित सागर डॅम लेकमध्ये कोसळसले होते. तेव्हापासून पायलट आणि को पायलट लेफ्टिनंट कर्न अभित सिंह बाथ आणि कॅप्टन जयंत जोशी बेपत्ता झाले होते. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुमारे ८० मीटर आत गेले होते. 

दरम्यान, अमृतसरमधील रहिवासी असलेल्या लेफ्टिनंट कर्नल बाथ यांचे पार्थिव १५ ऑगस्ट रोजी जलाशयात सापडले होते. मात्र कॅप्टन जयंत जोश यांच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती अद्याप हाती लागलेली नाही. कॅप्टन जोशींचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये सेवेत आहे. तिने तिचा मुलगा राष्ट्राला समर्पित केला आहे.

दरम्यान, कॅप्टन जयंत यांचे मोठे भाऊ नील यांनीही शोधमोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शोधमोहीम लवकरात लवकर संपवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संरक्षण दलाची दोनमोठी हत्यारे लष्कर आणि नौदल शोधमोहिमेत गुंतले आहे. तरीही २० दिवसांनंतर आम्हाला हेलिकॉप्टरचे अवशेष आणि जयंतचा मृतदेह एका सरोवरातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहोत, ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. ही बाब या शोधमोहिमेवर अनेक प्रश्न उपस्थित करते. मात्र आम्हाला त्यात पडायचे नाही आहे.

कॅप्टन जयंतचे वडील म्हणाले की, गेल्या सात महिन्यांमध्ये रुद्र हेलिकॉप्टरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये स्क्वाड्रनच्या तीन पायलटांचा मृत्यू झाला आहे. तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. कदाचित आता त्याला पुन्हा उड्डाण करता येणार नाही. पायलट एक एक करून मरत आहेत. ही बाब चिंतेची आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPunjabपंजाबAccidentअपघात