शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:25 IST

Pathankot helicopter crash: पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

नवी दिल्ली - पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. (Pathankot helicopter crash)त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने लष्कर आणि नौदलाची शोधमोहीम आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कॅप्टन जयंत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांमध्ये माझ्यातील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धनीने शोध घेतल्याने माझ्या मुलाचे पार्थिव पाण्यामध्ये कुसत आहे. (Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions)

पठाणकोटमधील मामून छावणीमधून ३ऑगस्ट रोजी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर रंजित सागर डॅम लेकमध्ये कोसळसले होते. तेव्हापासून पायलट आणि को पायलट लेफ्टिनंट कर्न अभित सिंह बाथ आणि कॅप्टन जयंत जोशी बेपत्ता झाले होते. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुमारे ८० मीटर आत गेले होते. 

दरम्यान, अमृतसरमधील रहिवासी असलेल्या लेफ्टिनंट कर्नल बाथ यांचे पार्थिव १५ ऑगस्ट रोजी जलाशयात सापडले होते. मात्र कॅप्टन जयंत जोश यांच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती अद्याप हाती लागलेली नाही. कॅप्टन जोशींचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये सेवेत आहे. तिने तिचा मुलगा राष्ट्राला समर्पित केला आहे.

दरम्यान, कॅप्टन जयंत यांचे मोठे भाऊ नील यांनीही शोधमोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शोधमोहीम लवकरात लवकर संपवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संरक्षण दलाची दोनमोठी हत्यारे लष्कर आणि नौदल शोधमोहिमेत गुंतले आहे. तरीही २० दिवसांनंतर आम्हाला हेलिकॉप्टरचे अवशेष आणि जयंतचा मृतदेह एका सरोवरातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहोत, ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. ही बाब या शोधमोहिमेवर अनेक प्रश्न उपस्थित करते. मात्र आम्हाला त्यात पडायचे नाही आहे.

कॅप्टन जयंतचे वडील म्हणाले की, गेल्या सात महिन्यांमध्ये रुद्र हेलिकॉप्टरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये स्क्वाड्रनच्या तीन पायलटांचा मृत्यू झाला आहे. तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. कदाचित आता त्याला पुन्हा उड्डाण करता येणार नाही. पायलट एक एक करून मरत आहेत. ही बाब चिंतेची आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPunjabपंजाबAccidentअपघात