शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:25 IST

Pathankot helicopter crash: पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

नवी दिल्ली - पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. (Pathankot helicopter crash)त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने लष्कर आणि नौदलाची शोधमोहीम आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कॅप्टन जयंत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांमध्ये माझ्यातील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धनीने शोध घेतल्याने माझ्या मुलाचे पार्थिव पाण्यामध्ये कुसत आहे. (Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions)

पठाणकोटमधील मामून छावणीमधून ३ऑगस्ट रोजी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर रंजित सागर डॅम लेकमध्ये कोसळसले होते. तेव्हापासून पायलट आणि को पायलट लेफ्टिनंट कर्न अभित सिंह बाथ आणि कॅप्टन जयंत जोशी बेपत्ता झाले होते. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुमारे ८० मीटर आत गेले होते. 

दरम्यान, अमृतसरमधील रहिवासी असलेल्या लेफ्टिनंट कर्नल बाथ यांचे पार्थिव १५ ऑगस्ट रोजी जलाशयात सापडले होते. मात्र कॅप्टन जयंत जोश यांच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती अद्याप हाती लागलेली नाही. कॅप्टन जोशींचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये सेवेत आहे. तिने तिचा मुलगा राष्ट्राला समर्पित केला आहे.

दरम्यान, कॅप्टन जयंत यांचे मोठे भाऊ नील यांनीही शोधमोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शोधमोहीम लवकरात लवकर संपवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संरक्षण दलाची दोनमोठी हत्यारे लष्कर आणि नौदल शोधमोहिमेत गुंतले आहे. तरीही २० दिवसांनंतर आम्हाला हेलिकॉप्टरचे अवशेष आणि जयंतचा मृतदेह एका सरोवरातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहोत, ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. ही बाब या शोधमोहिमेवर अनेक प्रश्न उपस्थित करते. मात्र आम्हाला त्यात पडायचे नाही आहे.

कॅप्टन जयंतचे वडील म्हणाले की, गेल्या सात महिन्यांमध्ये रुद्र हेलिकॉप्टरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये स्क्वाड्रनच्या तीन पायलटांचा मृत्यू झाला आहे. तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. कदाचित आता त्याला पुन्हा उड्डाण करता येणार नाही. पायलट एक एक करून मरत आहेत. ही बाब चिंतेची आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPunjabपंजाबAccidentअपघात