शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 22:55 IST

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. 

"मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. कल्याण सिंह हे राजकारणी, अनुभवी प्रशासक आणि महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी त्यांचे सुपुत्र राजवीर सिंह यांच्याशीही संवाद साधला आणि शोक व्यक्त केला," असं ट्वीट पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं आहे.विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली - नितीन गडकरी आदरणीय कल्याण सिंहजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. उत्तर प्रदेशात जनसंघ आणि भाजप उभा करण्यात कल्याण सिंहजी यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली. समर्पित राम भक्त, मातीशी नाळ असणारे खरे लोकनेते कल्याण सिंहजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

अमित शाहंनीही वाहिली श्रद्धांजलीकल्याण सिंह यांच्या निधनामुळे देशानं एक खरा राष्ट्रभक्त, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे एक असे विराट वटवृक्ष होते, ज्यांच्या भाजपचं संघटन अधिक वाढलं. राष्ट्रवादाचे खरे उपासक म्हणून त्यांनी जीवनभर देशाची आणि जनतेची सेवा केली असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.लोकसभा अध्यक्षांकडूनही श्रद्धांजलीकल्याण सिंह यांच्या निधनानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. "कल्याण सिंह यांच्या माध्यमातून आम्ही असं विराट व्यक्तीमत्व पाहिलं ज्यांनी आपल्या राजकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुऱ दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर एक छाप सोडली. इश्वर त्यांच्या आत्म्यास शआंती देवो," असं म्हणत बिर्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

अलीगढमध्ये झाला होता जन्म५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.

युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्रीकल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर  १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्लाTwitterट्विटरBJPभाजपा