शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जीवघेण्या आजाराचा विळखा! देशातील 'या' गावात कॅन्सरचा विस्फोट; गल्लोगली सापडताहेत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:58 IST

गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

आंध्र प्रदेशातील एका गावात जीवघेणा आजार पसरला आहे. येथील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. बालभद्रपुरम नावाच्या या गावाची जमीन खूप सुपीक आहे. येथे ऊस आणि भातासह अनेक धान्य पिकवली जातात. हे गाव समृद्ध असूनही, आजकाल येथे कॅन्सरचा धोका खूप वाढला आहे. गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

जिल्हाधिकारी पी प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालभद्रपुरम गावातील बहुतेक रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरचे आहेत. याशिवाय गावात घसा, आतडे आणि त्वचेच्या कॅन्सरचेहरी रुग्णही नोंदवले जात आहेत. गावात आतापर्यंत कॅन्सरचे ३२ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३ पट जास्त आहे. बालभद्रपुरम गावात सुमारे १०,८०० लोक राहतात, परंतु तेथे कॅन्सरचे एकूण १०० रुग्ण असल्याचा अंदाज आहे. अनापार्थीचे भाजपा आमदार नल्लमिल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी कॅन्सरच्या रुग्णांची प्रत्यक्ष संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते असं म्हटलं आहे.

६५ लोकांचा मृत्यू 

अधिकृतपणे गेल्या ३ वर्षांत गावात १९ लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे, परंतु गावकऱ्यांचा असा दावा आहे की, आतापर्यंत ६५ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त ३२ कॅन्सर रुग्णांपैकी १७ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. त्याच वेळी, १५ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. अनेक लोकांचा असा दावा आहे की, कॅन्सरचं मुख्य कारण जवळच्या कारखान्यांमधून होणारं प्रदूषण आहे. यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे.

गावात मोठा मेडिकल कँप 

कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने एक मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिट आणि डॉक्टरांची एक टीम पाठवली आहे. या पथकांनी गावात एक मोठा मेडिकल कँप उभारला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा आणि पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. तसेच २२-२३ मार्च २०२५ रोजी ५० डॉक्टरांसह २०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत होती.

टॅग्स :cancerकर्करोगAndhra Pradeshआंध्र प्रदेश