शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या आजाराचा विळखा! देशातील 'या' गावात कॅन्सरचा विस्फोट; गल्लोगली सापडताहेत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:58 IST

गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

आंध्र प्रदेशातील एका गावात जीवघेणा आजार पसरला आहे. येथील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. बालभद्रपुरम नावाच्या या गावाची जमीन खूप सुपीक आहे. येथे ऊस आणि भातासह अनेक धान्य पिकवली जातात. हे गाव समृद्ध असूनही, आजकाल येथे कॅन्सरचा धोका खूप वाढला आहे. गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

जिल्हाधिकारी पी प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालभद्रपुरम गावातील बहुतेक रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरचे आहेत. याशिवाय गावात घसा, आतडे आणि त्वचेच्या कॅन्सरचेहरी रुग्णही नोंदवले जात आहेत. गावात आतापर्यंत कॅन्सरचे ३२ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३ पट जास्त आहे. बालभद्रपुरम गावात सुमारे १०,८०० लोक राहतात, परंतु तेथे कॅन्सरचे एकूण १०० रुग्ण असल्याचा अंदाज आहे. अनापार्थीचे भाजपा आमदार नल्लमिल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी कॅन्सरच्या रुग्णांची प्रत्यक्ष संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते असं म्हटलं आहे.

६५ लोकांचा मृत्यू 

अधिकृतपणे गेल्या ३ वर्षांत गावात १९ लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे, परंतु गावकऱ्यांचा असा दावा आहे की, आतापर्यंत ६५ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त ३२ कॅन्सर रुग्णांपैकी १७ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. त्याच वेळी, १५ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. अनेक लोकांचा असा दावा आहे की, कॅन्सरचं मुख्य कारण जवळच्या कारखान्यांमधून होणारं प्रदूषण आहे. यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे.

गावात मोठा मेडिकल कँप 

कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने एक मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिट आणि डॉक्टरांची एक टीम पाठवली आहे. या पथकांनी गावात एक मोठा मेडिकल कँप उभारला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा आणि पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. तसेच २२-२३ मार्च २०२५ रोजी ५० डॉक्टरांसह २०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत होती.

टॅग्स :cancerकर्करोगAndhra Pradeshआंध्र प्रदेश