शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जीवघेण्या आजाराचा विळखा! देशातील 'या' गावात कॅन्सरचा विस्फोट; गल्लोगली सापडताहेत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:58 IST

गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

आंध्र प्रदेशातील एका गावात जीवघेणा आजार पसरला आहे. येथील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. बालभद्रपुरम नावाच्या या गावाची जमीन खूप सुपीक आहे. येथे ऊस आणि भातासह अनेक धान्य पिकवली जातात. हे गाव समृद्ध असूनही, आजकाल येथे कॅन्सरचा धोका खूप वाढला आहे. गावातील रस्त्यावर आणि गल्लोगली, परिसरात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लोक घाबरले आहेत.

जिल्हाधिकारी पी प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालभद्रपुरम गावातील बहुतेक रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सरचे आहेत. याशिवाय गावात घसा, आतडे आणि त्वचेच्या कॅन्सरचेहरी रुग्णही नोंदवले जात आहेत. गावात आतापर्यंत कॅन्सरचे ३२ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३ पट जास्त आहे. बालभद्रपुरम गावात सुमारे १०,८०० लोक राहतात, परंतु तेथे कॅन्सरचे एकूण १०० रुग्ण असल्याचा अंदाज आहे. अनापार्थीचे भाजपा आमदार नल्लमिल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी कॅन्सरच्या रुग्णांची प्रत्यक्ष संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते असं म्हटलं आहे.

६५ लोकांचा मृत्यू 

अधिकृतपणे गेल्या ३ वर्षांत गावात १९ लोकांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे, परंतु गावकऱ्यांचा असा दावा आहे की, आतापर्यंत ६५ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त ३२ कॅन्सर रुग्णांपैकी १७ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. त्याच वेळी, १५ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. अनेक लोकांचा असा दावा आहे की, कॅन्सरचं मुख्य कारण जवळच्या कारखान्यांमधून होणारं प्रदूषण आहे. यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे.

गावात मोठा मेडिकल कँप 

कॅन्सरच्या वाढत्या घटना लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने एक मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिट आणि डॉक्टरांची एक टीम पाठवली आहे. या पथकांनी गावात एक मोठा मेडिकल कँप उभारला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा आणि पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. तसेच २२-२३ मार्च २०२५ रोजी ५० डॉक्टरांसह २०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत होती.

टॅग्स :cancerकर्करोगAndhra Pradeshआंध्र प्रदेश