शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

Karunanidhi Death: मी एकदा शेवटची 'अप्पा' अशी हाक मारू का? स्टॅलिन यांची करुणानिधींवर कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:11 IST

Karunanidhi Death: करुणानिधी स्वतः लेखक आणि कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनानंतर अश्रू अनावर झालेल्या स्टॅलिन यांनी करुणानिधींवर कविता लिहिली आहे.

चेन्नई- तामिळनाडूच्या राजकारणावर आणि द्रविड चळवळीवर गेली अनेक दशके आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या करुणानिधींचे निधन झाले आहे. स्वतंत्र भारतात तामिळनाडूच्या राजकारणाचा विचार त्यांना वगळून करता येणारच नाही असे अढळस्थान त्यांनी मिळवले आहे. त्यांच्या निधनानंतर द्रमुकच्या नेत्यांना व समर्थकांना दुःख अनावर झाले आहे.

करुणानिधी स्वतः लेखक आणि कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनानंतर अश्रू अनावर झालेल्या स्टॅलिन यांनी करुणानिधींवर कविता लिहिली आहे. मी तुम्हाला एकदा शेवटची अप्पा म्हणून हाक मारु का असा भावनिक प्रश्न त्यांनी आपल्या दिवंगत वडिलांना विचारला आहे. या कवितेत स्टॅलिन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन 'असा माणूस जो कोणत्याही विश्रांतीविना कार्यरत राहिला, तो येथे अखेरची विश्रांती घेत आहे' असे केले आहे.स्टॅलिन करुणानिधींचे राजकीय वारस मानले जातात.

94 वर्षांच्या आयुष्यात करुणानिधींनी तमिळ अस्मिता, भाषा, संस्कृती आणि तमिळ चित्रपटसृष्टी याच विषयांवर सतत काम केले. वयाच्या 14 व्या वर्षांपासून करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यानंतर आयुष्याचा पुढील सर्व काळ त्यांनी याच क्षेत्रात व्यतित केला. जस्टीस पार्टीचे नेते अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने प्रभावित झाल्यावर करुणानिधी यांनी राजकीय चळवळीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात त्यांनी कार्य सुरु केले. त्यांनी स्थानिक तरुणांची एक संघटना स्थापन करुन एका 'मनवर नेसान' नावाने एक हस्तलिखित वर्तमानपत्राचे वितरण सुरु केले. त्यानंतर त्यांनी तमिळनाडू मनवर मंद्रम नावाची एक विद्यार्थी संघटना सुरु केली. द्रविड चळवळीच्या विद्यार्थी शाखेचं काम करणारे ते पहिले विद्यार्थी होते.

याबरोबर करुणानिधी यांनी समाजकार्याशी व विविध संघटनांशी स्वतःला जोडून घेतलं. यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्राची स्थापना केली. आज त्यामध्ये बदल होत मुरासोली नावाचे वर्तमानपत्र तयार झाले आहे. द्रमुक पक्षाचे ते अधिकृत मुखपत्र आहे. 1953 साली कल्लाकुडी प्रकल्पामुळे करुणानिधी एकदम वेगाने राजकारणाच्या पटलावर अवतरले. कल्लाकुडीचे नाव येथील सिमेंट कारखान्यामुळे दालमियापूरम करण्यात आले होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला तसेच द्रमुकनेही त्याला विरोध केला होता. या विरोधी आंदोलनात दोन लोकांचे प्राण गेले आणि करुणानिधी यांना अटक करण्यात आली होती.

1957 साली द्रमुक पक्षातर्फे निवडणूक लढवून करुणानिधी तामिळनाडू विधानसभेत गेले. 1961 साली ते द्रमुकचे कोशाध्यक्ष झाले आणि विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेतेपद मिळाले. 1967 साली ते तामिळनाडू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. 1969 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. अण्णादुराई यांचा वारसा ते चालवू लागले.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईDeathमृत्यू