शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहार: पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता; १८ जिल्हे, १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:58 IST

केंद्रांवर उत्सवासारखे वातावरण ठेवा: निवडणूक आयोगाने केली पर्यवेक्षकांना सूचना

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थांबला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात शांततेत व नि:पक्ष मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे.

सर्व मतदान केंद्रांवर शांतता आणि उत्सवासारखे वातावरण असावे, ज्यामुळे मतदार आकर्षित होतील, असे निर्देश निवडणूक आयोगाने पर्यवेक्षकांना दिले आहेत. प्रत्येक बूथवर शंभर टक्के वेबकास्टिंग, नवीन मतदारांसाठी माहितीपत्र यांसारख्या उपाययोजना आयोगाने केल्या असून, प्रत्येक बुथवर १२१ साधारण, १८ पोलिस व ३३ इतर पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

या टप्प्यातील २,१३५ मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ एक तास कमी करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होईल. ही मतदान केंद्रे संवेदनशील असून, मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या केंद्रांसाठी ही व्यवस्था आहे.

  • ३,७५,१३,३० - पहिल्या टप्प्यातील एकूण मतदार
  • १,०८,३५,३२५ - पहिल्या टप्प्यातील एकूण पुरुष मतदार
  • १,७६,७७,२१९ - पहिल्या टप्प्यातील महिला मतदार
  • ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश
  • ४५,३४१ मुख्य बूथ

वादग्रस्त विधानाबद्दल ललनसिंहांविरुद्ध गुन्हा

‘विरोधकांच्या घरोघरी जाऊन त्यांना बाहेर पडू देऊ नका’, असे वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री व जदयूचे नेते राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बुलेटवरील तरुणीने वेधले लक्ष, म्हणाली योगी ‘हीरो’

योगी यांचा हा रोड शो सुरू असताना आस्था नामक एक तरुणी योगींच्या वाहनासमोर बुलेटवर स्वार होती. योगी हे आपले ‘हीरो’ असल्याचे सांगून महिलांनी धाडसाने पुढे यावे व राजकारणात सक्रिय व्हावे, हा संदेश देण्यासाठी बुलेटवर निघालो असल्याचे ती म्हणाली.

तेजस्वी यांच्याकडून आश्वासनांचा पाऊस

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी समाप्त होण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते व महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत अनेक मोठ्या योजनांची आश्वासने दिली. महाआघाडीचे सरकार सत्तेत आले तर जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ७० किमी अंतराच्या क्षेत्रातच केल्या जातील, शेतकऱ्यांना मोफत वीज, अशी आश्वासने तेजस्वी यांनी दिली. माई-बहन योजनेंतर्गत ३० हजार रुपये एकरकमी दिले जातील, असेही तेजस्वी म्हणाले.

नितीशकुमार यांचे चॅनेल दिल्लीतून बदलतात: राहुल

औरंगाबाद (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे चॅनेल दिल्लीतील नेते टीव्हीच्या रिमोटसारखे बदलत असतात. दिल्लीच्या दोन नेत्यांना हवे तेच नितीशकुमार करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे आयोजित सभेत केली. बिहार सरकारने राज्यातील युवकांना देशाचे मजूर केले. एकेकाळी चीन, जपान, इतर देशांतून शिक्षणासाठी विद्यार्थी बिहारमध्ये येत होते. आज याच युवकांना  बिहारबाहेर रोजगार शोधावा लागत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. युवक रिल्सद्वारे पैसे कमावत असल्याचे भाजप नेते सांगतात, असे नमूद करून याचा लाभ बड्या उद्योगपतींनाच होत असल्याची टीका राहुल यांनी केली.

‘नितीशकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप नाही’

वैशाली : एवढी वर्षे सत्तेत राहूनही नितीशकुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी सांगितले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीए सरकारने अभूतपूर्व कार्य केले असल्याचे त्यांनी वैशाली येथे आयोजित जाहीर सभेत नमूद केले.

दरभंगात योगी यांचा १० किलोमीटर रोड शो

दरभंगा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी बिहारच्या दरभंगामध्ये १० किमी रोड शो केला. योगी हाती माईक घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते. तर, हजारोंच्या संख्येने जमलेले लोक ‘योगी-मोदी’ अशा घोषणा देत होते.  

‘जंगल राज’ रोखण्यासाठी कमळाचे बटण दाबा : शाह

बिहारमध्ये ‘जंगल राज’ पुन्हा परतू नये असे वाटत असेल तर ते रोखण्यासाठी मतदान यंत्रावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे बटण दाबा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे प्रचारसभेत केले. ज्या जंगल राजने राज्याचे नुकसान केले ते परतू नये म्हणून जागरूक राहावे, असेही शाह या वेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar First Phase Election Campaign Ends; Polling on November 6

Web Summary : Bihar's first phase election campaign concluded with polling for 121 seats across 18 districts scheduled for November 6. Promises, accusations, and rallies marked the final push, with leaders addressing key issues like employment and development.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५VotingमतदानBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारRajnath Singhराजनाथ सिंहTejashwi Yadavतेजस्वी यादव