शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह अडचणीत; निवडणूक आयोगाची राष्ट्रपतींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 11:35 IST

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडून भाषणादरम्यान आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग नजर ठेवून आहे.

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने कल्याण सिंह यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. सोमवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी केलेले विधान म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात अलीगडमध्ये कल्याण सिंह म्हणाले होते की, 'आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत. भाजपाचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटले. देशासाठी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत.' दरम्यान, या  विधानांवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे योग्य नाही. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. मात्र, कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदRajasthanराजस्थान