शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

'जाणूनबुजून निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी केली', विरोधकांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 19:15 IST

केंद्र सरकारने आज नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला.

CAA in india: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज बहुचर्चित CAA, म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला. विविध कारणांमुळे गेल्या चार वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता आज अखेर त्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारने CAA ची अधिसूचना जारी केल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. 

जयराम रमेश यांची टीकाCAA अधिसूचना जारी केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'डिसेंबर 2019 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे नियम अधिसूचित करण्यासाठी मोदी सरकारला चार वर्षे आणि तीन महिने लागले. भाजप सरकार अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि वेळेत काम करत असल्याचा पंतप्रधानांचा दावा असतो. पण, CAA चे नियम अधिसूचित करण्यासाठी लागणारा वेळ, हे पंतप्रधानांच्या खोटेपणाचे आणखी एक उदाहरण आहे.'

'नियमांच्या अधिसूचनेसाठी नऊ मुदतवाढ मागितल्यानंतर, सरकारने आता बरोबर लोकसभा निवडणुकीच्या आधी जाणूनबुजून हा कायदा लागू केला आहे. विशेषत: आसाम आणि बंगालमधील मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केले गेले आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड घोटाळ्यावर फटकारल्यानंतर बातम्या मॅनेज करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'निवडणुका जवळ आल्या की, वृत्तवाहिन्यांद्वारे माहिती पसरवायला सुरुवात होते. आज रात्रीपर्यंत CAA लागू होईल, असे चॅनेलवाले सांगत आहेत. चार वर्षांत अनेकवेळा मुदतवाढ दिल्यानंतर हा कायदा मंजूर करण्यात आला आणि निवडणुका जाहीर होण्याच्या दोन-तीन दिवस आधी त्याची अंमलबजावणी राजकीय कारणांसाठी केली जात आहे. आता नियम कसे बनवले जातात, याची आम्ही वाट पाहत आहोत. अद्याप आम्हाला माहिती मिळालेली नाही. सर्व नियम पाहिल्यानंतर आणि संपूर्ण अहवाल वाचल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलेन. कोणताही भेदभाव असेल तर तो आम्ही स्वीकारणार नाही.'

'त्यांनी सीएए आणि एनआरसीद्वारे कोणाचेही नागरिकत्व रद्द केले, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कोणत्याही किंमतीत एनआरसी स्वीकारणार नाही. आम्ही सीएएचा वापर लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यासाठी होऊ देणार नाही. भारत आणि बंगालमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक आहे. त्यांना सर्व अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. या नव्या कायद्याने जुने अधिकार हिरावून घेतले जाऊ नयेत. बंगालसोबतच ईशान्येकडील प्रदेशही अत्यंत संवेदनशील आहे. निवडणुकीपूर्वी कोणतीही अशांतता आम्हाला नको आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

काय आहे CAA ? नागरिकत्व सुधारण कायदा, म्हणजेच CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळाला कंटाळून भारतात आलेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन भारताचे नागरिकत्व घेऊ शकतात. केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे शेजारील देशातील अल्पसंख्याकांना आता भारतीय नागरिकत्व घेता येणार आहे. शेजारील देशांतून येणाऱ्या अल्पसंख्याकांना सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागेल.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस