शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

'CAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही', अमित शहांनी स्पष्ट केलं, विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 10:41 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना फटकारले आहे. शाह यांनी स्पष्ट केले की, CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. 'सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे, आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे शाह यांनी आश्वासन दिले. 'सीएएच्या माध्यमातून भाजप नवी व्होट बँक तयार करत आहे' या विरोधकांच्या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'विरोधकांकडे दुसरे काम नाही, त्यांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात ते करत नाहीत. पीएम मोदींची प्रत्येक हमी पूर्ण आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये? कलम ३७० हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं असंही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही अमित शाह म्हणाले. 

PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

आश्रय घेणारे आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल तो दिवस दूर नाही आणि घुसखोरी थांबवेल. तुम्ही असे राजकारण करत असाल आणि तुष्टीकरणाचे राजकारण करून राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घुसखोरी केली आणि निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही. ममता बॅनर्जी यांना आश्रय घेणारी व्यक्ती आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका

सीएम अरविंद केजरीवाल यांच्या आरोपवार शाह म्हणाले,'भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला आहे. हे सर्व लोक आधीच भारतात येऊन राहतात हे त्यांना माहीत नाही. त्यांना एवढीच काळजी असेल तर ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत किंवा रोहिंग्यांबद्दल का बोलत नाहीत? ते व्होटबँकेचे राजकारण करत आहेत, असंही शाह म्हणाले. 

अमित शाह म्हणाले, 'बरेच लोक आहेत, अद्याप कोणतीही गणना झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकजण अर्ज भरण्यास टाळाटाळ करतील. ज्यांनी येथे अर्ज केला आहे आणि नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवला आहे अशा सर्वांना मी खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल. हा कायदा तुम्हाला निर्वासित म्हणून स्वीकारत आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला असेल तर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाला समान अधिकार दिले जातील कारण ते भारताचे नागरिक होतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा