शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'CAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही', अमित शहांनी स्पष्ट केलं, विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 10:41 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना फटकारले आहे. शाह यांनी स्पष्ट केले की, CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. 'सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे, आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे शाह यांनी आश्वासन दिले. 'सीएएच्या माध्यमातून भाजप नवी व्होट बँक तयार करत आहे' या विरोधकांच्या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'विरोधकांकडे दुसरे काम नाही, त्यांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात ते करत नाहीत. पीएम मोदींची प्रत्येक हमी पूर्ण आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये? कलम ३७० हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं असंही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही अमित शाह म्हणाले. 

PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

आश्रय घेणारे आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल तो दिवस दूर नाही आणि घुसखोरी थांबवेल. तुम्ही असे राजकारण करत असाल आणि तुष्टीकरणाचे राजकारण करून राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घुसखोरी केली आणि निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही. ममता बॅनर्जी यांना आश्रय घेणारी व्यक्ती आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका

सीएम अरविंद केजरीवाल यांच्या आरोपवार शाह म्हणाले,'भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला आहे. हे सर्व लोक आधीच भारतात येऊन राहतात हे त्यांना माहीत नाही. त्यांना एवढीच काळजी असेल तर ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत किंवा रोहिंग्यांबद्दल का बोलत नाहीत? ते व्होटबँकेचे राजकारण करत आहेत, असंही शाह म्हणाले. 

अमित शाह म्हणाले, 'बरेच लोक आहेत, अद्याप कोणतीही गणना झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकजण अर्ज भरण्यास टाळाटाळ करतील. ज्यांनी येथे अर्ज केला आहे आणि नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवला आहे अशा सर्वांना मी खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल. हा कायदा तुम्हाला निर्वासित म्हणून स्वीकारत आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला असेल तर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाला समान अधिकार दिले जातील कारण ते भारताचे नागरिक होतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा