शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

'CAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही', अमित शहांनी स्पष्ट केलं, विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 10:41 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना फटकारले आहे. शाह यांनी स्पष्ट केले की, CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. 'सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे, आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे शाह यांनी आश्वासन दिले. 'सीएएच्या माध्यमातून भाजप नवी व्होट बँक तयार करत आहे' या विरोधकांच्या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'विरोधकांकडे दुसरे काम नाही, त्यांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात ते करत नाहीत. पीएम मोदींची प्रत्येक हमी पूर्ण आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये? कलम ३७० हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं असंही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही अमित शाह म्हणाले. 

PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

आश्रय घेणारे आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल तो दिवस दूर नाही आणि घुसखोरी थांबवेल. तुम्ही असे राजकारण करत असाल आणि तुष्टीकरणाचे राजकारण करून राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घुसखोरी केली आणि निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही. ममता बॅनर्जी यांना आश्रय घेणारी व्यक्ती आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका

सीएम अरविंद केजरीवाल यांच्या आरोपवार शाह म्हणाले,'भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला आहे. हे सर्व लोक आधीच भारतात येऊन राहतात हे त्यांना माहीत नाही. त्यांना एवढीच काळजी असेल तर ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत किंवा रोहिंग्यांबद्दल का बोलत नाहीत? ते व्होटबँकेचे राजकारण करत आहेत, असंही शाह म्हणाले. 

अमित शाह म्हणाले, 'बरेच लोक आहेत, अद्याप कोणतीही गणना झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकजण अर्ज भरण्यास टाळाटाळ करतील. ज्यांनी येथे अर्ज केला आहे आणि नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवला आहे अशा सर्वांना मी खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल. हा कायदा तुम्हाला निर्वासित म्हणून स्वीकारत आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला असेल तर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाला समान अधिकार दिले जातील कारण ते भारताचे नागरिक होतील.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा