शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:42 IST

आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली. 

अहमदाबाद - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने जबरदस्त कमबॅक केला आहे. आप पक्षाने भाजपाचा गड असलेल्या गुजरातमध्ये विसावदर मतदारसंघात त्यांचा कब्जा कायम ठेवला आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना मैदानात उतरवले होते. या पोटनिवडणुकीत गोपाल इटालिया यांनी काही राऊंड वगळता २१ राऊंडमध्ये हजारो मतांची आघाडी घेतली. त्यांनी भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांना १७ हजार मतांनी मात दिली आहे. दिल्लीत झालेल्या पराभवानंतर गुजरातमधील आपचा विजय पक्षाला संजीवनी देणारा आहे.

या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्ष वरचढ असल्याचे दिसत होते परंतु आम आदमी पक्षाने आखलेली व्यूहरचना विसावदरमध्ये भाजपाच्या पराभवाचे कारण बनली. भाजपाने या जागेवर विजयासाठी २००७ पासून वाट पाहत आहे. या पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली.  आपचे भूपेंदर भयाणी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. 

काय आहे आपच्या विजयाची ५ कारणे?

सर्वात आधी उमेदवाराच्या नावाची घोषणा - आम आदमी पक्षाने गुजरातमध्येही पंजाबचा फॉर्म्युला वापरला. दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर विसावदर जागेवर निवडणूक आयोगाने तारीख घोषित करण्यापूर्वीच आपने उमेदवार निश्चित केला. त्यात भाजपामध्ये उमेदवारीबाबत शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता तिथे आम आदमी पक्ष प्रचारात गुंतला होता.

मोठ्या चेहऱ्यावर लावला डाव  - गुजरातमधील ही जागा वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने त्यांच्या पक्षातील बड्या चेहऱ्यावर डाव लावला. गोपाल इटालिया या मतदारसंघातील रहिवासी नाहीत परंतु पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांनी २-३ दौरे करून लोकांमध्ये त्यांचा जम बसवला. त्यांनी लोकांमधील संपर्क वाढवला. त्यामुळे सत्तेत असूनही भाजपा उमेदवार प्रचारात मागे पडले. गोपाल इटालिया यांच्यासमोर किरीट पटेल कमकुवत ठरले.

केजरीवाल यांच्या चॅलेंजने वातावरण बदलले - २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपवर विश्वास ठेवला मात्र भूपेंदर भयाणी यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला झटका बसला. गोपाल इटालिया यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अरविंद केजरीवाल पोहचले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे जर भाजपाने गोपाल इटालिया यांना खरेदी केले तर मी राजकारण सोडेन असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे विसावदर मतदारसंघात गोपाल इटालिया यांना हिरो केले. 

भाजपाला मुद्द्यावर घेरले - विसावदर येथे मागील निवडणुकीत आपचा विजय झाला तेव्हा गोपाल इटालिया प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत सूरतच्या कतारगाम येथे ते लढले होते परंतु यावेळी विसावदर येथे त्यांनी फोकस ठेवला. उमेदवार म्हणून त्यांनी होमवर्क केला, असे सगळे मुद्दे उपस्थित केले ज्यात सत्ताधारी भाजपाला घेरता येईल. गोपाल इटालिया यांनी जनतेमध्ये राहून सत्ताधारी भाजपाची गोची केली. 

इसुदान गढवीने बूथ मजबूत केले - पत्रकारितेतून राजकारणात आलेले इसुदान गढवी यांनी या पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्षाची भूमिका निभावली. सौराष्टमधून आलेले इसुदान गढवी यांनी विसावदरमध्ये गोपाल इटालिया यांना उतरवण्यापूर्वी सर्व्हे घेतला आणि पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर ११ नेत्यांच्या कोअर कमिटीने एक बूथवर फोकस केले. त्यामुळे भाजपाचा पराभव आणि काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024