शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:42 IST

आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली. 

अहमदाबाद - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने जबरदस्त कमबॅक केला आहे. आप पक्षाने भाजपाचा गड असलेल्या गुजरातमध्ये विसावदर मतदारसंघात त्यांचा कब्जा कायम ठेवला आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना मैदानात उतरवले होते. या पोटनिवडणुकीत गोपाल इटालिया यांनी काही राऊंड वगळता २१ राऊंडमध्ये हजारो मतांची आघाडी घेतली. त्यांनी भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांना १७ हजार मतांनी मात दिली आहे. दिल्लीत झालेल्या पराभवानंतर गुजरातमधील आपचा विजय पक्षाला संजीवनी देणारा आहे.

या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्ष वरचढ असल्याचे दिसत होते परंतु आम आदमी पक्षाने आखलेली व्यूहरचना विसावदरमध्ये भाजपाच्या पराभवाचे कारण बनली. भाजपाने या जागेवर विजयासाठी २००७ पासून वाट पाहत आहे. या पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली.  आपचे भूपेंदर भयाणी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. 

काय आहे आपच्या विजयाची ५ कारणे?

सर्वात आधी उमेदवाराच्या नावाची घोषणा - आम आदमी पक्षाने गुजरातमध्येही पंजाबचा फॉर्म्युला वापरला. दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर विसावदर जागेवर निवडणूक आयोगाने तारीख घोषित करण्यापूर्वीच आपने उमेदवार निश्चित केला. त्यात भाजपामध्ये उमेदवारीबाबत शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता तिथे आम आदमी पक्ष प्रचारात गुंतला होता.

मोठ्या चेहऱ्यावर लावला डाव  - गुजरातमधील ही जागा वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने त्यांच्या पक्षातील बड्या चेहऱ्यावर डाव लावला. गोपाल इटालिया या मतदारसंघातील रहिवासी नाहीत परंतु पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांनी २-३ दौरे करून लोकांमध्ये त्यांचा जम बसवला. त्यांनी लोकांमधील संपर्क वाढवला. त्यामुळे सत्तेत असूनही भाजपा उमेदवार प्रचारात मागे पडले. गोपाल इटालिया यांच्यासमोर किरीट पटेल कमकुवत ठरले.

केजरीवाल यांच्या चॅलेंजने वातावरण बदलले - २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपवर विश्वास ठेवला मात्र भूपेंदर भयाणी यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला झटका बसला. गोपाल इटालिया यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अरविंद केजरीवाल पोहचले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे जर भाजपाने गोपाल इटालिया यांना खरेदी केले तर मी राजकारण सोडेन असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे विसावदर मतदारसंघात गोपाल इटालिया यांना हिरो केले. 

भाजपाला मुद्द्यावर घेरले - विसावदर येथे मागील निवडणुकीत आपचा विजय झाला तेव्हा गोपाल इटालिया प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत सूरतच्या कतारगाम येथे ते लढले होते परंतु यावेळी विसावदर येथे त्यांनी फोकस ठेवला. उमेदवार म्हणून त्यांनी होमवर्क केला, असे सगळे मुद्दे उपस्थित केले ज्यात सत्ताधारी भाजपाला घेरता येईल. गोपाल इटालिया यांनी जनतेमध्ये राहून सत्ताधारी भाजपाची गोची केली. 

इसुदान गढवीने बूथ मजबूत केले - पत्रकारितेतून राजकारणात आलेले इसुदान गढवी यांनी या पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्षाची भूमिका निभावली. सौराष्टमधून आलेले इसुदान गढवी यांनी विसावदरमध्ये गोपाल इटालिया यांना उतरवण्यापूर्वी सर्व्हे घेतला आणि पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर ११ नेत्यांच्या कोअर कमिटीने एक बूथवर फोकस केले. त्यामुळे भाजपाचा पराभव आणि काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024