शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचे आयुष्य किती वर्षांनी वाढले? समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:22 IST

Indians: भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

 नवी दिल्ली - भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासानुसार, साथीच्या रोगाचा धक्का बसला असतानाही, गेल्या तीन दशकांमध्ये भारतासह संपूर्ण जगामध्ये लोकांचे आयुष्य वाढले आहे. जगभरातील लोक १९९० च्या तुलनेत २०२१ मध्ये सरासरी ६.२ वर्षे जास्त जगत आहेत.

आयुष्य का वाढले? गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुष्य वाढले आहे. मात्र, असे असले तरीही गंभीर आजार आजही १९९० प्रमाणेच आहेत. अतिसार, श्वसन संक्रमण, स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोग यांसारख्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत. २०२० मध्ये जर कोरोना महामारी आली नसती तर लोकांचे आयुष्य आणखी वाढले असते, असे अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनाचा फटकाकोरोना महामारीमुळे २०१९ ते २०२१ दरम्यान जगभरातील नागरिकांचे आयुष्य १.६ वर्षांनी कमी झाले आहे. दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि ओशिनियामध्ये नागरिकांच्या आयुर्मानात ८.३ वर्षांची वाढ नोंदवली. या क्षेत्राचे कोरोनामुळे होणारे  आयुर्मान नुकसान कमी आहे. कोरोनाचा फटका लॅटिन अमेरिका, कॅरिबियनमध्ये बसला.

टॅग्स :IndiaभारतLifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्य