शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'धक्का बसला, रुळ उखडले, कोणी सीटखाली अडकला', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:22 IST

दिल्लीच्या आनंद विहार स्थानकातून गुवाहाटीच्या कामाख्याकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री अपघात झाला.

बिहारमधील बक्सरमधील रघुनाथपूर स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. या अपघातातरेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून त्यात आई आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, तर इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. २३ डब्यांसह १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने बुधवारी सकाळी ७:४० वाजता दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गुवाहाटीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामाख्याला जाण्यासाठी सुमारे ३३ तासांचा प्रवास केला. 

दरम्यान, बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ अपघात झाला. उषा भंडारी आणि तिची आठ वर्षांची मुलगी अमृता कुमारी अशी मृतांची नावे आहेत, त्या आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादियान गावातील रहिवासी होत्या. उषा त्यांची मुलगी आणि पतीशिवाय अन्य एका मुलीसोबत दिल्लीहून आसामला जात होत्या.

तिसऱ्या मृताचे नाव २७ वर्षीय जैद असून तो बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील सप्तेय विष्णुपूरचा रहिवासी आहे. ते दिल्लीहून किशनगंजला जात होते. चौथ्या मृताची ओळख पटलेली नाही. मृतांव्यतिरिक्त १०० जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर बक्सर, भोजपूर आणि पाटणा एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २३ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफची हत्या; तीन बंदूकधाऱ्यांचा मशिदीजवळ बेछूट गोळीबार

'ट्रॅक उखडला होता. काही प्रवासी बर्थखाली, काही खिडकीखाली तर काही प्रसाधनगृहात अडकले होते. हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत झाला. असा भयावह आवाज ऐकून शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना मदत करू लागले.

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आसामच्या अब्दुल मलिकने सांगितले की, आम्ही आमच्या बर्थखाली दबलो होतो. बाहेर येताच ट्रेनला अपघात झाल्याचे दिसले. सर्व बोगी इकडे तिकडे पडून आहेत. आजूबाजूचे अनेक लोक घटनास्थळी येऊन लोकांना मदत करत असल्याचे आम्ही पाहिले. बोगीत घुसून, बाहेरून काचा फोडून ते प्रवाशांना बाहेर काढत होते.

नॉर्थ ईस्ट १२५०५ ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी सांगितले की रात्रीचे ९.०० वाजले होते, आम्ही आमच्या सीटवर बसून पेपरवर्क करत होतो, तेव्हा अचानक धक्का बसला आणि आम्ही आमच्या सीटवरून पडलो. काय झाले ते समजू शकले नाही. ट्रेनचा वेग १०० किमी असावा. आम्ही तिथे उभे राहिलो तोपर्यंत ट्रेनचा अपघात झाला होता. अपघात कसा झाला, असे विचारले असता, अपघात कसा झाला याचे उत्तर फक्त चालकच देऊ शकेल, असे गार्डने सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात