शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

'धक्का बसला, रुळ उखडले, कोणी सीटखाली अडकला', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:22 IST

दिल्लीच्या आनंद विहार स्थानकातून गुवाहाटीच्या कामाख्याकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री अपघात झाला.

बिहारमधील बक्सरमधील रघुनाथपूर स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. या अपघातातरेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून त्यात आई आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, तर इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. २३ डब्यांसह १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने बुधवारी सकाळी ७:४० वाजता दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गुवाहाटीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामाख्याला जाण्यासाठी सुमारे ३३ तासांचा प्रवास केला. 

दरम्यान, बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ अपघात झाला. उषा भंडारी आणि तिची आठ वर्षांची मुलगी अमृता कुमारी अशी मृतांची नावे आहेत, त्या आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादियान गावातील रहिवासी होत्या. उषा त्यांची मुलगी आणि पतीशिवाय अन्य एका मुलीसोबत दिल्लीहून आसामला जात होत्या.

तिसऱ्या मृताचे नाव २७ वर्षीय जैद असून तो बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील सप्तेय विष्णुपूरचा रहिवासी आहे. ते दिल्लीहून किशनगंजला जात होते. चौथ्या मृताची ओळख पटलेली नाही. मृतांव्यतिरिक्त १०० जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर बक्सर, भोजपूर आणि पाटणा एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २३ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफची हत्या; तीन बंदूकधाऱ्यांचा मशिदीजवळ बेछूट गोळीबार

'ट्रॅक उखडला होता. काही प्रवासी बर्थखाली, काही खिडकीखाली तर काही प्रसाधनगृहात अडकले होते. हा अपघात इतका भीषण होता की त्याचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत झाला. असा भयावह आवाज ऐकून शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना मदत करू लागले.

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आसामच्या अब्दुल मलिकने सांगितले की, आम्ही आमच्या बर्थखाली दबलो होतो. बाहेर येताच ट्रेनला अपघात झाल्याचे दिसले. सर्व बोगी इकडे तिकडे पडून आहेत. आजूबाजूचे अनेक लोक घटनास्थळी येऊन लोकांना मदत करत असल्याचे आम्ही पाहिले. बोगीत घुसून, बाहेरून काचा फोडून ते प्रवाशांना बाहेर काढत होते.

नॉर्थ ईस्ट १२५०५ ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी सांगितले की रात्रीचे ९.०० वाजले होते, आम्ही आमच्या सीटवर बसून पेपरवर्क करत होतो, तेव्हा अचानक धक्का बसला आणि आम्ही आमच्या सीटवरून पडलो. काय झाले ते समजू शकले नाही. ट्रेनचा वेग १०० किमी असावा. आम्ही तिथे उभे राहिलो तोपर्यंत ट्रेनचा अपघात झाला होता. अपघात कसा झाला, असे विचारले असता, अपघात कसा झाला याचे उत्तर फक्त चालकच देऊ शकेल, असे गार्डने सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात