शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'...पण मी असे होऊ देणार नाही'; भाजप नेत्याच्या विधानावर ममता बॅनर्जी भडकल्या, मुद्दा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:32 IST

Ram navami political news: विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. त्यात भाजप नेत्याने केलेल्या एका विधानावरून ममता बॅनर्जींनी टीका केली.

Mamata Banerjee vs Suvendu Adhikari:पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात भाजप जोरात तयारीला लागली आहे. त्यात आता राम नवमीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना ६ एप्रिल रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शोभायात्रा काढणार आहे असून, भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. अशात भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या एका विधानावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आणि हे दंगली करायला आले आहेत, असे म्हणाल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "यावर्षी राम नवमीच्या दिवशी कमीत कमी १ कोटी हिंदू पश्चिम बंगालमधील रस्त्यावर उतरतील. २००० शोभायात्रा काढल्या जातील. यात्रा काढण्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेऊ नका. रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शांत राहू, पण प्रशासनाने हे निश्चित करावं की दुसरे लोकही शांततेत राहतील."

हेही वाचा >>रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स

भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या याच विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. हे दंगल करण्यासाठी आली आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जींनी अधिकारी यांच्यावर टीका केली. 

ममता बॅनर्जींची सुवेंदू अधिकारींच्या टीकेवर भूमिका काय?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी सुद्धा हिंदू आहे. मुसलमान पण आहे, शीख आहे आणि ख्रिश्चन सुद्धा आहे. पण, त्या सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे. विरोधी पक्षाचे राजकारण फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचे आहे. मी असे होऊ देणार नाही. काही लोक राज्यात दंगली घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या चिथावणीला बळू पडू नका", अशी भूमिका ममता बॅनर्जींनी मांडली. 

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये घडली होती हिंसक घटना

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये राम नवमीच्या दिवशी हिंसक घटना घडल्या होत्या. १७ एप्रिल २०२४ रोजी मुर्शिदाबादमधील शक्तिपूरमध्ये राम नवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान हिंसा झाली होती. 

काही लोकांनी छतावरून दगड आणि बॉम्ब फेकल्याचा आरोप केला गेला होता. यात २ मुले आणि पोलिसांसह १८ लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास आधी पोलिसांनी केला. त्यानंतर ते प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आणि नंतर तपास एआयएकडे सोपवण्यात आला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाRam Navamiराम नवमीtmcठाणे महापालिका