शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

'...पण मी असे होऊ देणार नाही'; भाजप नेत्याच्या विधानावर ममता बॅनर्जी भडकल्या, मुद्दा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:32 IST

Ram navami political news: विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. त्यात भाजप नेत्याने केलेल्या एका विधानावरून ममता बॅनर्जींनी टीका केली.

Mamata Banerjee vs Suvendu Adhikari:पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात भाजप जोरात तयारीला लागली आहे. त्यात आता राम नवमीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटना ६ एप्रिल रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शोभायात्रा काढणार आहे असून, भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. अशात भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या एका विधानावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आणि हे दंगली करायला आले आहेत, असे म्हणाल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "यावर्षी राम नवमीच्या दिवशी कमीत कमी १ कोटी हिंदू पश्चिम बंगालमधील रस्त्यावर उतरतील. २००० शोभायात्रा काढल्या जातील. यात्रा काढण्यासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेऊ नका. रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शांत राहू, पण प्रशासनाने हे निश्चित करावं की दुसरे लोकही शांततेत राहतील."

हेही वाचा >>रमजान ईदच्या दिवशी बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट; अंधेरीत सापडले बिश्नोई गँगचे शूटर्स

भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या याच विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. हे दंगल करण्यासाठी आली आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जींनी अधिकारी यांच्यावर टीका केली. 

ममता बॅनर्जींची सुवेंदू अधिकारींच्या टीकेवर भूमिका काय?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी सुद्धा हिंदू आहे. मुसलमान पण आहे, शीख आहे आणि ख्रिश्चन सुद्धा आहे. पण, त्या सगळ्यात आधी मी एक भारतीय आहे. विरोधी पक्षाचे राजकारण फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचे आहे. मी असे होऊ देणार नाही. काही लोक राज्यात दंगली घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या चिथावणीला बळू पडू नका", अशी भूमिका ममता बॅनर्जींनी मांडली. 

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये घडली होती हिंसक घटना

पश्चिम बंगालमध्ये २०२४ मध्ये राम नवमीच्या दिवशी हिंसक घटना घडल्या होत्या. १७ एप्रिल २०२४ रोजी मुर्शिदाबादमधील शक्तिपूरमध्ये राम नवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान हिंसा झाली होती. 

काही लोकांनी छतावरून दगड आणि बॉम्ब फेकल्याचा आरोप केला गेला होता. यात २ मुले आणि पोलिसांसह १८ लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास आधी पोलिसांनी केला. त्यानंतर ते प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आणि नंतर तपास एआयएकडे सोपवण्यात आला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाRam Navamiराम नवमीtmcठाणे महापालिका