शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

लग्नाच्याच दिवशी ट्रेनच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू, मोबाइलवर बोलणं बेतलं जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 10:48 IST

मोबाइलवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

बरेली- रेल्वे रूळ ओलांडताना मोबाइलवर बोलणं एका इंजिनिअरच्या जीवावर बेतलं आहे. मोबाइलवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नरेश पाल गंगवार (वय ३०) असं या तरुणाचे नाव आहे. धक्कादायत म्हणजे रविवारी संध्याकाळीच नरेशचे लग्न होणार होतं. नरेश हा नोएडातील एका खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत होता. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नरेश रविवारी सकाळी मोबाइल फोनवर बोलत असताना रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याच्याकडे दोन मोबाइल फोन होते. यातील एका फोनवर तो बोलत होता. तर दुसऱ्या फोनवरुन तो मेसेज करत होता. याचदरम्यान तिथून राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. फोनवर बोलत असल्याने तसंच दुसऱ्या हातातील फोनमध्ये मेसेज टाइप करत असल्याने त्याचं एक्स्प्रेसकडे लक्ष नव्हतं. यामुळे भरधाव एक्स्प्रेसची नरेशला धडक बसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

रविवारी संध्याकाळी नरेश पलचं उमा गंगावर हिच्याशी लग्न होणार होतं. नरेशचं संपूर्ण कुटुंब लग्नाच्या शेवटच्या तयारीत व्यस्त होतं. पण त्याचवेळी त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. मुलाचा एक्स्प्रेसच्या धडकेत सकाळी नऊ वाजता मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना समजलं.लग्नाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने नरेशचं संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं आहे. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. मी त्याच्या लग्नासाठी इथे आलो होतो. पण आता त्याच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला, असं नरेशचा मित्र अनिल गंगावार याने म्हंटलं. 

बरेलीतील नंदोशी येथे ही घटना घडली. नरेशचे घर रेल्वे रुळा लगतच होते. ऑफीसमधील एका सहकाऱ्याचा फोन आल्याने नरेश घरातून बाहेर गेला होता. ‘नरेश फोनवर बोलत असल्याने त्याचे एक्स्प्रेसच्या हॉर्नकडे लक्ष गेलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पोलिसांनीही या प्रकरणाची अपघाती मृत्यूची नोंद केली. ‘ही आत्महत्या नसून अपघात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

दरम्यान, मोबाइल फोनमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देशात वाढली आहे. मे 2014 ते जानेवारी 2016 या काळात एकुण 16 जणांचा रेल्वे रूळावर सेल्फी काढताना अपघात होऊन मृत्यू झाला. तसंच मोबाइलचा वापर रस्ते अपघातांनाही निमंत्रण देतं, असंही एका सर्व्हेतून समोर आलं आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMobileमोबाइल