शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:32 IST

अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला.

नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंदौली परिसरात कार आणि बाईकचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. काळाने झडप घातली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. 

लग्नामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. जोरदार तयारी सुरू होती असं असताना कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील हिंडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काछी घाटीजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. त्यावेळी प्रेमचंद कहार (25), प्रदीप कहार (17) आणि नितेश कहार (20) हे एकाच बाईकवरून जात होते. 

जयपूरहून कोटाकडे जाणाऱ्या कारला त्यांच्या बाईकची जोरदार धडक बसली. या अपघातात तीनही तरुण गंभीर जखमी झाले होते. हिंदौली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश बाबू यांनी ही माहिती दिली की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची परिस्थिती पाहता डॉक्टरांना त्यांना कोटा येथे पाठवले. 

कोटा येथे उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृतांमधील प्रेमचंद कहार याचे 15 मेला लग्न होणार होते. यांचसंदर्भात खरेदीसाठी तीनही जण हिंदौली येथे गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते डोडूंदा येथे परतत होते. याचवेळी ही भीषण दुर्घटना घडली. प्रेमचंदच्या मृत्यूनंतर परिवारात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्न