शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बजेटच्या दिवशी मतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला 'विजयाचा हात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:15 IST

गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना दोन राज्यातून आलेले लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

ठळक मुद्देब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे.राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे

जयपूर - राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात सर्वच जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये ब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे. गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आलेले निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. अलवरमधून काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. अजमेरमधून काँग्रेस उमेदवार रघु शर्मा यांनी भाजपाच्या राम स्वरुप लांबा यांचा पराभव केला. 

मांडलगड विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा सामना झाला. इथून काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांनी भाजपाच्या शक्ति सिंह हाडाचा 12,976 मतांनी पराभव केला. राजस्थानात काँग्रेसची कमान सचिन पायलट यांच्या हाती होती. हे निकाल म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते.  

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा विजय उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमदने बंपर विजयाची नोंद केली. नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमुल उमेदवार सुनील सिंह 1,11,729 मतांनी विजय मिळवला.

म्हणून पोटनिवडणूक राजस्थानातील खासदार सांवरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेरची जागा रिक्त झाली होती तर अलवरची जागा महंत चांदनाथ यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा