शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

बजेटच्या दिवशी मतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला 'विजयाचा हात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:15 IST

गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना दोन राज्यातून आलेले लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

ठळक मुद्देब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे.राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे

जयपूर - राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात सर्वच जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये ब-याच काळापासून संघर्ष करणा-या काँग्रेसला अखेर जनतेने 'हात' दिला असून पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमुलवर आपली 'ममता' कायम ठेवली आहे. गुरुवारी संपूर्ण देशाचे लक्ष बजेटवर लागलेले असताना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आलेले निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 

राजस्थानमध्ये अजमेर, अलवर या लोकसभेच्या दोन जागांवर तर मांडलगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. अलवरमधून काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. अजमेरमधून काँग्रेस उमेदवार रघु शर्मा यांनी भाजपाच्या राम स्वरुप लांबा यांचा पराभव केला. 

मांडलगड विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा सामना झाला. इथून काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांनी भाजपाच्या शक्ति सिंह हाडाचा 12,976 मतांनी पराभव केला. राजस्थानात काँग्रेसची कमान सचिन पायलट यांच्या हाती होती. हे निकाल म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण राजस्थानमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते.  

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलचा विजय उलुबेरिया लोकसभा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमदने बंपर विजयाची नोंद केली. नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमुल उमेदवार सुनील सिंह 1,11,729 मतांनी विजय मिळवला.

म्हणून पोटनिवडणूक राजस्थानातील खासदार सांवरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेरची जागा रिक्त झाली होती तर अलवरची जागा महंत चांदनाथ यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा