शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:08 IST

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते.

ठळक मुद्देआज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत.एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते.

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारीसुद्धा सरकार विकणार आहे. मात्र, विमा क्षेत्रातील सरकारी कंपनीमधील भागीदारी विकण्यात येणारी एलआयसी ही पहिलीच कंपनी नाहीय. तर याआधी तीन वर्षांपूर्वी दोन सरकारी विमा कंपन्यांचे आयपीओ तयार करण्यात आलेले आहेत. 

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. यानंतर बीएसएनएल, एलआयसी या मोठ्या सरकारी कंपन्यांचा नंबर असल्याचे म्हटले जात होते. आज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.

एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत. तीन वर्षांपूर्वी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अशुरन्सचे आयपीओ शेअर बाजारात नोंद करण्यात आले आहेत. एलआयसीच्या भागीदारी विक्रीचा फायदा सरकारला होणार असला तरीही त्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावे लागणार आहेत. सरकारने नुकताच आयआरसीटीसीचा आयपीओ उभारला होता. मात्र, आयआरसीटीसी ही कमर्शिअल उद्देशाने स्थापन केलेली कंपनी होती. एलआयसीच्या बाबतीत तसे नाही. 

एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते. मात्र, एलआयसी कायदा 1956 नुसार इरडाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त समभाग विकण्यासाठी एलआयसीला परवानगी नाही. एलआयसी कायद्याच्या सेक्शन 37 नुसार एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने सर्व पॉलिसींना बोनससह ठराविक रक्कम द्यावी लागते. यामुळे या कायद्यानुसार एलआयसी आणखी समभाग विकू शकत नाही. हा कायदा बदलावा लागणार आहे.

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

एलआयसीचा आयपीओ आल्यास....एलआयसीचा आयपीओ आल्यास त्याचा सर्वात मोठा फटका रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला बसण्याची शक्यता आहे. सध्या या कंपन्या शेअर बाजारात आघाडीवर आहेत. लोकांच्या एलआयसीवरील विश्वासामुळे हे होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनLIC - Life Insurance CorporationएलआयसीNarendra Modiनरेंद्र मोदी