शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 03:42 IST

तेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही.

- प्रल्हाद इंगोलेतेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही. सरसकट कर्जमुक्ती, भावानंतर योजना, सिंचन योजना, पीक विमा, कर्जपुरवठा, कृषी क्षेत्रातील संशोधन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेतील चढउतार, सेंद्र्रिय शेतमालापासून तयार झालेल्या उत्पादनाला बाजारपेठ आदी विषयाला साधा स्पर्शसुद्धा या अर्थसंकल्पात झालेला दिसला नाही.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकºयांसाठी अत्यंत निराशादायक होता. पाच एकरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांना सहा हजार रुपये थेट मदत आणि तीही तीन टप्प्यांत सरकारची ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या बाबतीत राज्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. खरीप, रब्बी व उन्हाळी यापैकी केवळ खरीप हंगामात शंभर टक्के पेरणी होते. रब्बी हंगामात काही प्रमाणात तर उन्हाळी हंगामात फारच कमी पेरणी असते, असे असताना सरकारची हंगामनिहाय दोन हजार रुपयांची मदत किती अनाकलनीय आहे हे स्पष्ट होते. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने काही आघाड्यांवर चांगले काम केल्याचे दावे जरी कोणी करत असले, तरी शेतकºयांच्या बाबतीत मात्र या सरकारला सपशेल अपयश आल्याचे कोणालाही नाकारता येणार नाही.नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांनी केंद्र सरकारला दाखवून दिले की, नाराज शेतकरी काय करू शकतो. त्यातूनही मोदी सरकारने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. एखादी लोकप्रिय घोषणा केली, म्हणजे शेतकरी त्याला बळी पडतील असाच समज केंद्र सरकारचा झाल्याचे दिसत आहे. शेतकºयांना सरकारच्या तोकड्या मदतीची गरज नसून, शेतकरी उत्पादित करत असलेल्या मालाला हमीभावाची त्याच्या संरक्षणाची सरकारकडून अपेक्षा आहे. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात रयतू बंधू या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकºयांना पैसे दिल्याने, पुन्हा त्यांचे स्पष्ट बहुमत आल्याचा समज केंद्र सरकारला झाला व त्याची कॉपी करण्याच्या नादात पाच एकरपर्यंतच्या शेतकºयांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची थेट मदत देण्याची योजना जाहीर केली, पण केंद्राच्या या योजनेचे निकष चुकल्याने याचा सरकारला व शेतकºयाला काहीही फायदा होणार नाही असेच दिसते. तेलंगणामध्ये ‘रयतू बंधू’ या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी प्रति एकर आठ हजार रुपयांची थेट मदत शेतकºयांना दिली जाते. खरीप व रब्बी हंगामात पेरणीच्या वेळेस प्रति एकर चार-चार हजार अशी मदत मिळाल्याने ते पैसे शेतकºयांच्या कामी येत आहेत. एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना, सरकारच्या दोन हजार रुपयांमध्ये शेतकºयांना कोणती मदत होईल, हे राज्यकर्त्यांनीच तपासून पाहावे.काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्याने शेतकºयांना कर्जमुक्त करून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार काही रचनात्मक (कर्जपुरवठा-कृषी उत्पादन-कृषी प्रक्रिया-दराची हमी- बाजारपेठ) अशी ठोस योजना आणतील, असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीही झाले नाही. यामुळे शेतकºयांचा फार मोठा भ्रमनिरास झाला असून, सरकार शेतकºयांच्या बाबतीत किती संवेदनाहीन झाले आहे, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. शेतकºयांच्या डोळ्यांत धूळफेक करत, २२ पिकांना एमएसपी जाहीर करून दीडपट हमीभाव (अ2+ऋछ) देत असल्याचे सांगण्यात आले, पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार, उ2+50% नफा = हमीभाव सरकारने दिला नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, तर सरकारने उ3+50% सूत्र स्वीकारले असते. मात्र, मोदी सरकारने देशातील शेतकºयांची पुन्हा एकदा घोर निराशा केली. शेतकºयांना मदत होईल, अशी एकही योजना या अर्थसंकल्पात नव्हती. महागाई कमी झाल्याचा दिंडोरा सरकार पिटत आहे, परंतु या महागाई कमी राखण्यात शेतकºयांचा बळी गेला त्याचे काय? यातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने कर्जमाफी केली नाही, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला नाही.(लेखक महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे  सदस्य आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी