शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 03:42 IST

तेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही.

- प्रल्हाद इंगोलेतेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही. सरसकट कर्जमुक्ती, भावानंतर योजना, सिंचन योजना, पीक विमा, कर्जपुरवठा, कृषी क्षेत्रातील संशोधन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेतील चढउतार, सेंद्र्रिय शेतमालापासून तयार झालेल्या उत्पादनाला बाजारपेठ आदी विषयाला साधा स्पर्शसुद्धा या अर्थसंकल्पात झालेला दिसला नाही.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकºयांसाठी अत्यंत निराशादायक होता. पाच एकरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांना सहा हजार रुपये थेट मदत आणि तीही तीन टप्प्यांत सरकारची ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या बाबतीत राज्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. खरीप, रब्बी व उन्हाळी यापैकी केवळ खरीप हंगामात शंभर टक्के पेरणी होते. रब्बी हंगामात काही प्रमाणात तर उन्हाळी हंगामात फारच कमी पेरणी असते, असे असताना सरकारची हंगामनिहाय दोन हजार रुपयांची मदत किती अनाकलनीय आहे हे स्पष्ट होते. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने काही आघाड्यांवर चांगले काम केल्याचे दावे जरी कोणी करत असले, तरी शेतकºयांच्या बाबतीत मात्र या सरकारला सपशेल अपयश आल्याचे कोणालाही नाकारता येणार नाही.नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांनी केंद्र सरकारला दाखवून दिले की, नाराज शेतकरी काय करू शकतो. त्यातूनही मोदी सरकारने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. एखादी लोकप्रिय घोषणा केली, म्हणजे शेतकरी त्याला बळी पडतील असाच समज केंद्र सरकारचा झाल्याचे दिसत आहे. शेतकºयांना सरकारच्या तोकड्या मदतीची गरज नसून, शेतकरी उत्पादित करत असलेल्या मालाला हमीभावाची त्याच्या संरक्षणाची सरकारकडून अपेक्षा आहे. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात रयतू बंधू या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकºयांना पैसे दिल्याने, पुन्हा त्यांचे स्पष्ट बहुमत आल्याचा समज केंद्र सरकारला झाला व त्याची कॉपी करण्याच्या नादात पाच एकरपर्यंतच्या शेतकºयांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची थेट मदत देण्याची योजना जाहीर केली, पण केंद्राच्या या योजनेचे निकष चुकल्याने याचा सरकारला व शेतकºयाला काहीही फायदा होणार नाही असेच दिसते. तेलंगणामध्ये ‘रयतू बंधू’ या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी प्रति एकर आठ हजार रुपयांची थेट मदत शेतकºयांना दिली जाते. खरीप व रब्बी हंगामात पेरणीच्या वेळेस प्रति एकर चार-चार हजार अशी मदत मिळाल्याने ते पैसे शेतकºयांच्या कामी येत आहेत. एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना, सरकारच्या दोन हजार रुपयांमध्ये शेतकºयांना कोणती मदत होईल, हे राज्यकर्त्यांनीच तपासून पाहावे.काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्याने शेतकºयांना कर्जमुक्त करून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार काही रचनात्मक (कर्जपुरवठा-कृषी उत्पादन-कृषी प्रक्रिया-दराची हमी- बाजारपेठ) अशी ठोस योजना आणतील, असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीही झाले नाही. यामुळे शेतकºयांचा फार मोठा भ्रमनिरास झाला असून, सरकार शेतकºयांच्या बाबतीत किती संवेदनाहीन झाले आहे, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. शेतकºयांच्या डोळ्यांत धूळफेक करत, २२ पिकांना एमएसपी जाहीर करून दीडपट हमीभाव (अ2+ऋछ) देत असल्याचे सांगण्यात आले, पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार, उ2+50% नफा = हमीभाव सरकारने दिला नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, तर सरकारने उ3+50% सूत्र स्वीकारले असते. मात्र, मोदी सरकारने देशातील शेतकºयांची पुन्हा एकदा घोर निराशा केली. शेतकºयांना मदत होईल, अशी एकही योजना या अर्थसंकल्पात नव्हती. महागाई कमी झाल्याचा दिंडोरा सरकार पिटत आहे, परंतु या महागाई कमी राखण्यात शेतकºयांचा बळी गेला त्याचे काय? यातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने कर्जमाफी केली नाही, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला नाही.(लेखक महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे  सदस्य आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी