शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 05:30 IST

एफआरबीएम कायदा पूर्णत: वाऱ्यावर; मतचाचण्यांच्या निष्कर्षांना गृहीत धरून सवलतींची बरसात

- सोपान पांढरीपांडे नागपूर : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प कमी आणि निवडणूक जाहीरनामा जास्त अशा स्वरूपाचा आहे. यात गोयल यांनी मध्यमवर्गीय, पगारदार, कामगार, शेतकरी महिला, व्यापारी व उद्योजक अशा सर्व घटकांना सवलती दिल्या आहेत. जनमत सर्वेक्षणात भाजपाप्रणीत रालोआचे केवळ २५२ खासदार निवडून येतील हे भाकीत घेऊन ही सवलतींची बरसात आहे.मध्यमवर्गीयांसाठी ६.५० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले त्याचा फायदा दोन कोटी प्राप्तिकरदात्यांना आणि किसान सन्मान योजनेचा लाभ १२ कोटी शेतकºयांना होईल. या १५ कोटी कुटुंबांच्या मतांसाठी सरकारने २२,७०० कोटी महसुलावर पाणी सोडले आहे.या अर्थसंकल्पात किसान सन्मान योजनेचा बोजा या वर्षी (२०१८-१९) २०,००० कोटी व पुढच्या वर्षी ७५,००० कोटी असेल. याशिवाय ईशान्य राज्यातील पायाभूत सोयींसाठीचे ५८,००० कोटी अशा १.५३ लाख कोटींचा नवा बोजा सरकारवर पडेल. एकूण अर्थसंकल्पीय खर्च व महसूल २७.८४ लाख कोटींचा आहे. सरकारचा महसूल ३.२७ लाख कोटीने वाढला असताना नवीन बोजा ५० टक्के आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट २०१८-१९ व २०१९-२० या दोन्ही वर्षांसाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.४० टक्के व महसुली तूट २.२० टक्के राहणार आहे.अर्थसंकल्पात नवीन रोजगार कुठून येणार याबाबत ठोस भाष्य नाही. पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास होताना नवीन रोजगार संधी निर्माण होतात, पण त्या तात्पुरत्या असतात. त्यामुळे स्थायी रोजगार म्हणजे नियमित उत्पन्न देणाºया नोकºया कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यावर अर्थसंकल्पात काहीही उल्लेख नाही.अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटकावाजपेयी सरकारने २००३ साली ठरवल्याप्रमाणे फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट (एफआरबीएम) कायद्यानुसार अर्थसंकल्पीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के व महसुली तूट १.५० टक्का असायला हवी. लोकानुनयी अर्थसंकल्प देण्याच्या नादात याकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष केले असून, याचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस