शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Budget 2019: अब की बार, घटला मध्यमवर्गीयांचा करभार; प्रसन्न होणार का नोकरदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:09 IST

पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त प्राप्तिकर टप्पे आणि दर कायम

नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या अडीच लाख रुपयांची असलेली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. प्रमाणित वजावट (स्टॅँडर्ड डिडक्शन) ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे. या निर्णयाचे लोकसभेतील सदस्यांनी मेज वाजवून स्वागत केले. प्राप्तिकराचे अन्य टप्पे आणि दर त्यांनी कायम ठेवले आहेत.प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा अर्थमंत्री गोयल यांनी अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांवर नेली आहे. याशिवाय आयकरचे टप्पे आणि दर यामध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. जेव्हा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल, त्या वेळी पाच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना काही दिलासा दिला जाऊ शकेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करतानाच गोयल यांनी प्रमाणित वजावट ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे. यामुळे सर्वच उत्पन्न गटातील करदात्यांना दिलासा मिळणार आहे. आधीपासून प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० (सी) खाली असलेली दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला करामधून सूट मिळण्याची तरतूद कायम राखली आहे.टीडीएसच्या रकमेत बदलबॅँका, तसेच पोस्ट आॅफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजार रुपयांवरून ४० हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे बॅँका, तसेच पोस्टामधील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार असून, बॅँकांना १५ जी/एच फॉर्म भरून घेण्याचा त्रासही कमी होणार आहे. सध्या बॅँकांमधील ठेवींवरील व्याज वर्षाला १० हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्यावर उद्गमी करकपात केली जात होती.ज्या ठेवीदारांचे उत्पन्न करपात्र नाही, अशांना दरवर्षी बॅँकेला १५ जी/एच हा फॉर्म भरून द्यावा लागत होता. आत ही मर्यादा ४० हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढून बॅँकांना दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयलTaxकर