शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पोस्टवर कारवाईचा बडगा; पोस्ट हटविण्याच्या कंपन्यांना सूचना, कारवाईवरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:58 IST

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आण‍ि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुमारे १०० पोस्ट हटविण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आण‍ि केंद्र सरकारवरसोशल मीडियावरुन टीका होत आहे. अशा पोस्टविरोधात सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोविड नियमावलीचा भंग तसेच असंबंध असल्याची कारणे देऊन केंद्र सरकारने या पोस्ट हटविण्यासाठी ट्वीटर आणि फेसबुकला नोटिसा बजावल्या आहेत. 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आण‍ि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुमारे १०० पोस्ट हटविण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. चित्रपट अभिनेता विनीतकुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास इत्यादींनी कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका ट्वीटरवरुन केली होती.  त्याबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की या पोस्ट जुन्या असून सध्यस्थितीत त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच काही पोस्ट या चुकीच्या असून जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने संवेदनशील होत्या. 

एकीकडे संपूर्ण देश कोरोनासोबत लढत असताना काही जण सोशल मीडियाचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरुन अशा पोस्टचे युआरएल हटविण्यास सांगण्यात आले आहे.

कोणत्या पोस्ट करता येणार नाहीत-

  • ट्वीटर, फेसबुक आण‍ि इंस्टाग्रामवरील काही वापरकर्त्यांवर कोरोनासंबंधी माहिती, ऑक्सिजन, बेड्स, औषधे इत्यादींच्या
  • उपलब्धतेबाबत पोस्ट करणे किंवा थेट मेसेज करण्यापासून निर्बंध लावण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र यास नकार दिला आहे.
  • आयटी नियमांचा भंग झाल्यास संबंधित खाते ब्लॉक करण्यात येते किंवा मजकूर हटविण्यात येतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 
  • सरकारच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. त्यांनी हटविण्यात आलेल्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स स्वत:च्या ट्वीटरवर शेअर करुन प्रश्न उपस्थित केला आहे.
  • मध्ये कोणती आणि कुठे चुकीची माहिती असल्याचा प्रश्न करुन सत्य कसे डिलिट केले जाऊ शकते, हे पाहू, असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या