शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रमेश बिधूडींचे आक्षेपार्ह विधान, दानिश अलींचे PM मोदींना पत्र; म्हणाले, “जग पाहतंय की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 17:33 IST

Danish Ali Letter To PM Modi: भाजप खासदार रमेश बिधूडींनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दानिश अलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३ पानी पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे.

Danish Ali Letter To PM Modi: लोकसभेमध्ये भाजप खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार रमेश बिधूडी संसदेच्या विशेष अधिवेशनातील चौथ्या दिवशी लोकसभेमध्ये चंद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. खासदार दानिश अली यांनी काही टिप्पणी केली होती. त्यावर रमेश बिधूडी संतप्त झाले. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये दानिश अली यांच्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला. यावरून मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे. यातच आता दानिश अली यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पानी पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. 

रमेश बिधूडी यांच्याशी लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केली. रमेश बिधूडी यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली असून, कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भाषेच्या मर्यादेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. वाद वाढल्यानंतर रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपने खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता दानिश अली यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. 

दानिश अली यांनी आपल्या पत्रात नेमके काय म्हटलेय?

दानिश अलीने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच संसदेची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहनही पंतप्रधानांना केले. अशा वर्तनाचा जाहीर निषेध केल्याने संसदीय कामकाजाचा उच्च दर्जा राखण्यासाठी तुमची बांधिलकी दिसून येईल, असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दानिश अली यांनी दिली आहे. जीवाला धोका असल्याने सुरक्षा प्रदान करावी. याशिवाय रमेश बिधूडी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दानिश अली यांनी केली आहे. 

संसदीय लोकशाहीचे मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे

संसदीय लोकशाहीचे मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे. सर्व खासदारांना सभागृहाचा शिष्टाचार आणि आचरण यांचे महत्त्व राखण्याची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो. अशा अशोभनीय घटनांना आपल्या लोकशाहीत स्थान नसावे. मी विनंती करतो की रमेश बिधूडी यांच्या निंदनीय वर्तनाची जबाबदारी लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी. योग्य ती शिक्षा द्यावी जेणेकरुन भविष्यात सभागृहात असे प्रकार कोणी करू नये, अशी मागणी दानिश अली यांनी आपल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून रमेश बिधूडी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. बिधूडी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारण