शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 09:38 IST

राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर काँग्रेसने गरिबांना साद घातली. 'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असे आश्वासन राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं आहे. मात्र राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

मायावती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घोषणा केलेल्या किमान उत्पन्नाच्या हमीची ‘गरिबी हटाव’ घोषणेशी तुलना केली आहे. राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच हे एक आश्वासन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी अशी आश्वासनं देण्याआधी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी असंही मायावती यांनी म्हटलं आहे. 

मायावतींचा 'व्हॉट्सअ‍ॅप नंबर' सोशल मीडियात व्हायरल

राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन ‘गरिबी हटाव’ प्रमाणेच आहे. भाजपा सरकारने काळ्या पैशाविरोधात आश्वासन दिले होते. त्यांनी देशातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आणि अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :mayawatiमायावतीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा