शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 02:57 IST

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

दिल्ली/कोलकाता : सुमारे ४,०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सतर्कता वाढवली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे हा खबरदारीचा उपाय केला जात आहे.बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.बीएसएफने १९ ते २९ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत पाच बांगलादेशी नागरिकांना रेल्वे डब्यांमधून पकडले होते. ते पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आले होते. त्यांचे वय १२ ते २५ वर्षे होते. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर या लोकांना आमिष देऊन सीमापार तस्करीच्या माध्यमातून आणले गेले, असे समजले जात आहे. यामुळे बीएसएफने आपल्या सर्व सीमा चौक्यांवर सतर्कता वाढवली आहे.दिल्लीत बीएसएफच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या मुद्यावर आम्ही आमचे समकक्ष बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्याशी समन्वय साधून आहोत. सीमेवर असे प्रकार घडता कामा नयेत, हे पाहणे आमचे काम आहे. याबरोबरच पकडलेल्या गुन्हेगारांची योग्य पद्धतीने चौकशीही केली जात आहे. बीएसएफ व बीजीबीचे सध्या चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल आपापल्या गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत आहे.दक्षिण बंगालला लागून असलेली ९१३ किलोमीटरची सीमा अधिक संवेदनशील समजली जाते. या सीमेवर बहुतांश गुन्हे घडतात. यात मानवी तस्करी, पाळीव प्राण्यांची तस्करी, अंमलीपदार्थांची तस्करी, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून अनेक ठिकाणी माणसांना बेकायदेशीररीत्या भारतातपाठवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.प्राण्यांच्या तस्करीसाठी नवनवीन पद्धतीमान्सूनचा काळ व नद्यांना आलेले अफाट पाणी याद्वारेही भारतातून बांगलादेशात पाळीव प्राण्यांची तस्करी केली जाते.पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असा प्रकार प्रथमच उघडकीस आला. एका सांगाड्यात लपवून जिवंत बछड्याची तस्करी केली जात असताना पकडले होते.केळीच्या खांबांचा तराफा बनवून त्याला बांधून प्राण्यांची तस्करी केली जाते. असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत.नदीतून होणारी तस्करी टाळण्यासाठी सीमा सुरक्षा दल बोटद्वारेगस्त घालत आहे.तसेच सीमेवर मोठमोठे खड्डे खोदले जातआहेत.सीमेवरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालणाºया जवानांची गुन्हेगारांशी चकमक होऊन जानेवारी २०१८ ते जून २०२० या कालावधीत २०० पेक्षा अधिक जवान जखमी झालेले आहेत.

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश