शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 02:57 IST

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

दिल्ली/कोलकाता : सुमारे ४,०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सतर्कता वाढवली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे हा खबरदारीचा उपाय केला जात आहे.बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.बीएसएफने १९ ते २९ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत पाच बांगलादेशी नागरिकांना रेल्वे डब्यांमधून पकडले होते. ते पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आले होते. त्यांचे वय १२ ते २५ वर्षे होते. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर या लोकांना आमिष देऊन सीमापार तस्करीच्या माध्यमातून आणले गेले, असे समजले जात आहे. यामुळे बीएसएफने आपल्या सर्व सीमा चौक्यांवर सतर्कता वाढवली आहे.दिल्लीत बीएसएफच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या मुद्यावर आम्ही आमचे समकक्ष बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्याशी समन्वय साधून आहोत. सीमेवर असे प्रकार घडता कामा नयेत, हे पाहणे आमचे काम आहे. याबरोबरच पकडलेल्या गुन्हेगारांची योग्य पद्धतीने चौकशीही केली जात आहे. बीएसएफ व बीजीबीचे सध्या चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल आपापल्या गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत आहे.दक्षिण बंगालला लागून असलेली ९१३ किलोमीटरची सीमा अधिक संवेदनशील समजली जाते. या सीमेवर बहुतांश गुन्हे घडतात. यात मानवी तस्करी, पाळीव प्राण्यांची तस्करी, अंमलीपदार्थांची तस्करी, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून अनेक ठिकाणी माणसांना बेकायदेशीररीत्या भारतातपाठवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.प्राण्यांच्या तस्करीसाठी नवनवीन पद्धतीमान्सूनचा काळ व नद्यांना आलेले अफाट पाणी याद्वारेही भारतातून बांगलादेशात पाळीव प्राण्यांची तस्करी केली जाते.पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असा प्रकार प्रथमच उघडकीस आला. एका सांगाड्यात लपवून जिवंत बछड्याची तस्करी केली जात असताना पकडले होते.केळीच्या खांबांचा तराफा बनवून त्याला बांधून प्राण्यांची तस्करी केली जाते. असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत.नदीतून होणारी तस्करी टाळण्यासाठी सीमा सुरक्षा दल बोटद्वारेगस्त घालत आहे.तसेच सीमेवर मोठमोठे खड्डे खोदले जातआहेत.सीमेवरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालणाºया जवानांची गुन्हेगारांशी चकमक होऊन जानेवारी २०१८ ते जून २०२० या कालावधीत २०० पेक्षा अधिक जवान जखमी झालेले आहेत.

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश