शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 02:57 IST

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

दिल्ली/कोलकाता : सुमारे ४,०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सतर्कता वाढवली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे हा खबरदारीचा उपाय केला जात आहे.बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.बीएसएफने १९ ते २९ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत पाच बांगलादेशी नागरिकांना रेल्वे डब्यांमधून पकडले होते. ते पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आले होते. त्यांचे वय १२ ते २५ वर्षे होते. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर या लोकांना आमिष देऊन सीमापार तस्करीच्या माध्यमातून आणले गेले, असे समजले जात आहे. यामुळे बीएसएफने आपल्या सर्व सीमा चौक्यांवर सतर्कता वाढवली आहे.दिल्लीत बीएसएफच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या मुद्यावर आम्ही आमचे समकक्ष बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्याशी समन्वय साधून आहोत. सीमेवर असे प्रकार घडता कामा नयेत, हे पाहणे आमचे काम आहे. याबरोबरच पकडलेल्या गुन्हेगारांची योग्य पद्धतीने चौकशीही केली जात आहे. बीएसएफ व बीजीबीचे सध्या चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल आपापल्या गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत आहे.दक्षिण बंगालला लागून असलेली ९१३ किलोमीटरची सीमा अधिक संवेदनशील समजली जाते. या सीमेवर बहुतांश गुन्हे घडतात. यात मानवी तस्करी, पाळीव प्राण्यांची तस्करी, अंमलीपदार्थांची तस्करी, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून अनेक ठिकाणी माणसांना बेकायदेशीररीत्या भारतातपाठवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.प्राण्यांच्या तस्करीसाठी नवनवीन पद्धतीमान्सूनचा काळ व नद्यांना आलेले अफाट पाणी याद्वारेही भारतातून बांगलादेशात पाळीव प्राण्यांची तस्करी केली जाते.पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असा प्रकार प्रथमच उघडकीस आला. एका सांगाड्यात लपवून जिवंत बछड्याची तस्करी केली जात असताना पकडले होते.केळीच्या खांबांचा तराफा बनवून त्याला बांधून प्राण्यांची तस्करी केली जाते. असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत.नदीतून होणारी तस्करी टाळण्यासाठी सीमा सुरक्षा दल बोटद्वारेगस्त घालत आहे.तसेच सीमेवर मोठमोठे खड्डे खोदले जातआहेत.सीमेवरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालणाºया जवानांची गुन्हेगारांशी चकमक होऊन जानेवारी २०१८ ते जून २०२० या कालावधीत २०० पेक्षा अधिक जवान जखमी झालेले आहेत.

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश