शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १ हजार भारतीय विद्यार्थी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 23:42 IST

Bangladesh Protests: त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे.

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा सिस्टम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन सुरू आहे. काही आठवड्यातच या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशात पसरलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बांगलादेशातून जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत.

त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे. दरम्यान, २० जुलै रोजी सकाळी बीएसएफच्या त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक पीयूष पुरुषोत्तम पटेल यांना बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा फोन आला. त्याठिकाणी अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांना सांगण्यात आलं. तसंच इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांविषयी माहिती जाणून घेणं अवघड होत असल्याचं सांगितलं.

यानंतर आयजी बीएसएफनं कोमिल्ला येथील बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) च्या एरिया कमांडरशी संपर्क साधला आणि दोन्ही सीमा सुरक्षा दलांमध्ये चॅनेल अॅक्टिव्ह करण्यात आले. यानंतर बीएसएफ आणि बीजीबीने एकत्रितपणे सुनियोजित ऑपरेशन केलं. बीओपी अखुराजवळील सीमेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी बीजीबीनं घेतली आणि त्यानंतर बीएसएफनं या विद्यार्थ्यांची काळजी घेतली. सीमेवर या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. यानंतर बीएसएफच्या गाड्यांद्वारे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली.

दरम्यान, भारतानं हे हिंसक आंदोलन बांगलादेशातील अंतर्गत प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, शेजारील देशात राहणारे १५००० भारतीय सुरक्षित आहेत, ज्यामध्ये ८,५०० विद्यार्थी आहेत. तसंच, भारताचं परराष्ट्र खातं या घटनांवर लक्ष ठेवून आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बांगलादेशातून मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, बांगलादेशात नोकऱ्यांमधील आरक्षण संपवण्यासाठी संतप्त आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. बहुतांश बस, ट्रेन सेवा बंद आहेत. शाळा, कॉलेज यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. बांगलादेशातील हे आंदोलन नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात आहे. काही समुहांना सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवल्या जातात. हा प्रकार भेदभाव करणं आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याला सरकारी नोकरीपासून वंचित ठेवतं असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. 

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. ज्यात ३० टक्के आरक्षण पाकिस्तानसोबत १९७१ च्या लढाईत उतरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी आहे. त्याशिवाय १० टक्के वंचित प्रशासकीय जिल्ह्यांसाठी, १० टक्के महिला, ५ टक्के अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या जातींसाठी तर १ टक्के आरक्षण दिव्यांगासाठी आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतStudentविद्यार्थीagitationआंदोलन