शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १ हजार भारतीय विद्यार्थी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 23:42 IST

Bangladesh Protests: त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे.

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा सिस्टम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन सुरू आहे. काही आठवड्यातच या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशात पसरलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बांगलादेशातून जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत.

त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे. दरम्यान, २० जुलै रोजी सकाळी बीएसएफच्या त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक पीयूष पुरुषोत्तम पटेल यांना बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा फोन आला. त्याठिकाणी अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांना सांगण्यात आलं. तसंच इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांविषयी माहिती जाणून घेणं अवघड होत असल्याचं सांगितलं.

यानंतर आयजी बीएसएफनं कोमिल्ला येथील बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) च्या एरिया कमांडरशी संपर्क साधला आणि दोन्ही सीमा सुरक्षा दलांमध्ये चॅनेल अॅक्टिव्ह करण्यात आले. यानंतर बीएसएफ आणि बीजीबीने एकत्रितपणे सुनियोजित ऑपरेशन केलं. बीओपी अखुराजवळील सीमेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी बीजीबीनं घेतली आणि त्यानंतर बीएसएफनं या विद्यार्थ्यांची काळजी घेतली. सीमेवर या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. यानंतर बीएसएफच्या गाड्यांद्वारे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली.

दरम्यान, भारतानं हे हिंसक आंदोलन बांगलादेशातील अंतर्गत प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, शेजारील देशात राहणारे १५००० भारतीय सुरक्षित आहेत, ज्यामध्ये ८,५०० विद्यार्थी आहेत. तसंच, भारताचं परराष्ट्र खातं या घटनांवर लक्ष ठेवून आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बांगलादेशातून मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, बांगलादेशात नोकऱ्यांमधील आरक्षण संपवण्यासाठी संतप्त आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. बहुतांश बस, ट्रेन सेवा बंद आहेत. शाळा, कॉलेज यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. बांगलादेशातील हे आंदोलन नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात आहे. काही समुहांना सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवल्या जातात. हा प्रकार भेदभाव करणं आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याला सरकारी नोकरीपासून वंचित ठेवतं असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. 

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. ज्यात ३० टक्के आरक्षण पाकिस्तानसोबत १९७१ च्या लढाईत उतरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी आहे. त्याशिवाय १० टक्के वंचित प्रशासकीय जिल्ह्यांसाठी, १० टक्के महिला, ५ टक्के अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या जातींसाठी तर १ टक्के आरक्षण दिव्यांगासाठी आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतStudentविद्यार्थीagitationआंदोलन