शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 11:58 IST

तेलंगणात काँग्रेस आमदारांच्या संख्येत वाढ, बीआरएस सोडून या आमदारांनी रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. 

नवी दिल्ली - तेलंगणात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बीआरएस पक्षाला लागलेली गळती थांबत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला. गुरुवारी विधान परिषदेचे ६ आमदार बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झालेत आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. या ६ आमदारांमध्ये विठ्ठल दांडे, भानु प्रसाद राव, एम.एस प्रभाकर, बोग्गरापु दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवाराजू सरैया यांचा समावेश आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळात आणखी काही आमदार सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

२ दिवसांपूर्वी बीआरएसला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार के केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत केशव राव यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तेलंगणात झालेल्या पराभवानंतर बीआरएस पक्षाचे आमदार सातत्याने पक्ष सोडत आहेत. त्याशिवाय हैदराबादच्या महापौर विजया लक्ष्मी आर गडवाल यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत BRS ला फटका

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १९९ जागांपैकी बीआरएसला फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसनं ६४ जागा जिंकत राज्यात सत्ता मिळवली. सिंकदराबाद कॅन्टोन्मेंटच्या बीआरएसच्या आमदार जी लास्या नंदिता यांचं यावर्षीच्या सुरुवातीला रस्ते अपघातात निधन झाले. त्यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ६५ झाली.

विधान परिषदेचं संख्याबळ वाढलं

तेलंगणा वेबसाईटनुसार, विधान परिषदेत सध्या बीआरएसकडे २५ सदस्य आहेत तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. ४० सदस्यीय विधान परिषदेत ४ नामनिर्देशित सदस्य आहेत. ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमीनचे २, भाजपा आणि पीआरटीयूचे १-१ आणि अपक्ष १ असे सदस्य आहेत. तर २ जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे गुरुवारी तेलंगणात परतताच याठिकाणी बीआरएसच्या ६ सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आमदारांचं संख्याबळ १० इथपर्यंत वाढलं आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीTelanganaतेलंगणा