शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

पायलट अभिनंदनची आज होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 5:23 AM

भारत मात्र भूमिकेवर ठाम : दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणारच

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी पाकिस्तानी संसदेत केली. इम्रान खान यांची ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जात असून, भारताचा तसेच आंतरराष्ट्रीय दबाव यांमुळेच पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांची सुटका होणार असल्याच्या वृत्ताने भारतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानी संसदेत दोन देशांतील तणावाबाबत सविस्तर निवेदन केल्यानंतर इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका करण्यात येईल, असे जाहीर केले. अभिनंदन यांना उद्या लाहोरला नेण्यात येणार असून, तेथून पंजाबमधील वाघा बॉर्डरवर आणले जाईल. तेथे त्यांचा ताबा भारताकडे देण्यात येईल. इम्रान खान म्हणाले की, भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. दुसरीकडे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता.

अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारतापुढे शांततेचा प्रस्ताव ठेवला. तसेच पंतप्रधान मोदी यांना बुधवारी संध्याकाळी फोन केला. पण मोदी यांनी त्यांचा फोन घेतला नाही. आधी अभिनंदन यांची सुटका व नंतरच चर्चा वा वाटाघाटी होतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. मुख्य म्हणजे एरवी भारताबाबत अतिशय शत्रुत्वाची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी लष्करानेही अभिनंदन यांच्या सुटकेबाबत इम्रान खान यांनीच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या इतिहासात बहुधा प्रथमच तेथील लष्कराने भारतासंदर्भात लोकनियुक्त सरकारला काही निर्णय घेण्याची मुभा दिली असावी. कदाचित भारताशी वैर परवडणारे नाही, याचा अंदाज तेथील लष्करालाही आला असावा. अभिनंदन यांची सुटका न केल्यास आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा इशाराच भारताने दिला होता.हा कमकुवतपणा समजू नका - इम्रानइम्रान खान संसदेत म्हणाले की, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही भारतीय वैमानिकाची उद्या सुटका करणार आहोत, मात्र आमच्या या पावलाला कोणी पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. भारत व पाकिस्तानमधील तणावाचे मूळ काश्मीर आहे. भारतही दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करताना त्यांनी श्रीलंकेतील तामिळ वाघांचा उल्लेख केला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान