शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

अरेरे! हार घातला पण सप्तपदी नाही...; दागिने न मिळाल्याने नवरीने दिला लग्नास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 18:36 IST

लग्नामुळे घरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येने पाहुणे आले होते.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका नवरीने नवरदेवाच्या कुटुंबाने दागिने कमी आणले म्हणून लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात कमी दागिने पाहून वधू खूप नाराज झाली आणि अखेरच्या क्षणी तिने लग्नास नकार दिला. खूप प्रयत्न करूनही ती नंतर लग्नासाठी तयार झाली नाही. शेवटी वरापक्षाला वधूशिवायच रिकाम्या हाताने परतावं लागलं. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. रविवारी रात्री लग्नाची वरात आली होती. लग्नामुळे घरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येने पाहुणे आले होते. नृत्य आणि गायनानंतर लग्नातील पाहुण्यांना नाश्ता देण्यात आला. नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. त्यानंतर स्पार्कल गनने आतिषबाजी केली. मात्र त्यानंतर लग्न मंडपात वर पक्षाने वधूसाठी दागिने आणि इतर वस्तू आणल्या नव्हत्या. त्यामुळे वधूने लग्नास नकार दिला. 

18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या लग्नातील वादाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. बनसडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी (19 फेब्रुवारी) दोन्ही पक्षांची पोलीस ठाण्यात पंचायतही झाली. 

पोलिसांचं म्हणणं आहे की, वर पक्षाने वधूसाठी दागिने आणि इतर वस्तू आणल्या नाहीत, यामुळे वधू पक्ष संतप्त झाला. त्यामुळे त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात आले आणि एकमेकांशी बोलले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :marriageलग्न