शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेबाबत सरकार सतर्क, मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, विशेष तयारीच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 22:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी आणि उष्मा आणि शमन उपायांशी संबंधित आपत्ती तयारीची माहिती घेतली.

नवी दिल्ली :  देशातील बहुतांश भागांत मार्च ते मे या तीन महिन्यांत उष्णेत्या लाटांचा (Heat Wave) सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने म्हणजेच 'आयएमडी'ने व्यक्त केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली सोमवारी संध्याकाळी उष्ण हवामानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी आणि उष्मा आणि शमन उपायांशी संबंधित आपत्ती तयारीची माहिती घेतली.

यासंदर्भात पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध भागधारकांसाठी विविध जागरूकता सामग्री तयार करण्यास सांगितले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आयएमडी'ला दैनंदिन हवामानाचा अंदाज अशा प्रकारे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत की, त्याचा अर्थ लावणे आणि प्रसारित करणे सोपे जाईल. तसेच, पंतप्रधानांनी सर्व रुग्णालयांच्या विस्तृत फायर ऑडिटच्या गरजेवर भर दिला आणि प्रतिकूल हवामानात अन्नधान्याचा इष्टतम साठा सुनिश्चित करण्यासाठी एफसीआयला तयार राहण्यास सांगितले.

पीएमओच्या म्हणण्यानुसार, अति उष्णतेचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करण्यासाठी शाळांना विशेष व्याख्याने आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, 'उष्ण हवामानासाठी काय आणि काय करू नये' हे सुलभ स्वरूपात तयार केले जावे आणि जिंगल्स, चित्रपट, पॅम्प्लेट्स इत्यादी प्रसिद्धीची विविध माध्यमे देखील तयार करून प्रसिद्ध केली जावीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचबरोबर, 'आयएमडी'ला दैनंदिन हवामानाचा अंदाज अशा प्रकारे जारी करण्यास सांगितले आहे की, ज्याचा सहज अर्थ लावला जाऊ शकतो आणि प्रसारित करता येईल. हवामानाचा अंदाज प्रसारित करण्यासाठी वृत्तवाहिन्या, एफएम रेडिओ इत्यादींचा समावेश करण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला, जेणेकरून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेता येईल.

याचबरोबर, पंतप्रधानांनी सर्व रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक उपायांचे तपशीलवार ऑडिट करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.अग्निशमन विभागाकडून सर्व रुग्णालयांमध्ये मॉक फायर ड्रिल घेण्यात याव्यात, असे सांगितले आहे. याशिवाय, जंगलातील आगीचा सामना करण्यासाठी समन्वित प्रयत्नांच्या आवश्यतेवर जोर दिला आणि ती रोखण्यासाठी प्रयत्नांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचे आवाहन केले. तसेच, जलाशयांमध्ये चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. दरम्यान, या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि एनडीएमएचे सदस्य सचिव उपस्थित होते.

"मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल'यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सगळ्यात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअस राहिले. १९०१ नंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या १२२ वर्षात यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७३ अंश जास्त राहिले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा ०.८१ अंश जास्त राहिले. तसेच, मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका मध्य आणि उत्तर भारताला बसण्याची शक्यता आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी उष्णतेची लाट आली, तर गहू, मोहरी आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार अन्न महागाई कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा फटका बसू शकतो.तसेच, तापमान वाढल्यामुळे विजेची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHeat Strokeउष्माघात