शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:00 IST

Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली.

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक आणि भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान एआय १७१ काही मिनिटांतच कोसळलं. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.

या अपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील दिली असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक आणि निष्ठावान चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.

विजय रूपाणी- एक शांत, संयमी आणि समर्पित नेतृत्वविजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारची राजधानी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९६० मध्ये कुटुंबासह गुजरातमधील राजकोटमध्ये स्थलांतर केलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता.

विद्यार्थी दशेपासूनच विजय रुपाणी यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) सक्रिय असलेल्या रूपाणी यांनी १९७१ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाशी निष्ठावान राहिले.

राजकीय वाटचाल२०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपली जागा सोडल्याने राजकोट पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यात भाजपने रुपाणी यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आणि राजकोट पश्चिममधून आमदार झाले. त्यांना २०१४ मध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि परिवहन, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर, ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिले.

एक विचारवंत आणि स्पष्टवक्ता नेता हरपला!विजय रूपाणी हे आपल्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी आणि भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघाताची अधिकृत चौकशी सुरूसरकारकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, एअर इंडियाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटना