शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:00 IST

Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली.

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक आणि भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान एआय १७१ काही मिनिटांतच कोसळलं. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.

या अपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील दिली असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक आणि निष्ठावान चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.

विजय रूपाणी- एक शांत, संयमी आणि समर्पित नेतृत्वविजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारची राजधानी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९६० मध्ये कुटुंबासह गुजरातमधील राजकोटमध्ये स्थलांतर केलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता.

विद्यार्थी दशेपासूनच विजय रुपाणी यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) सक्रिय असलेल्या रूपाणी यांनी १९७१ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाशी निष्ठावान राहिले.

राजकीय वाटचाल२०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपली जागा सोडल्याने राजकोट पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यात भाजपने रुपाणी यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आणि राजकोट पश्चिममधून आमदार झाले. त्यांना २०१४ मध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि परिवहन, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर, ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिले.

एक विचारवंत आणि स्पष्टवक्ता नेता हरपला!विजय रूपाणी हे आपल्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी आणि भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघाताची अधिकृत चौकशी सुरूसरकारकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, एअर इंडियाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटना