शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:00 IST

Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली.

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक आणि भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान एआय १७१ काही मिनिटांतच कोसळलं. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.

या अपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील दिली असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक आणि निष्ठावान चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.

विजय रूपाणी- एक शांत, संयमी आणि समर्पित नेतृत्वविजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारची राजधानी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९६० मध्ये कुटुंबासह गुजरातमधील राजकोटमध्ये स्थलांतर केलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता.

विद्यार्थी दशेपासूनच विजय रुपाणी यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) सक्रिय असलेल्या रूपाणी यांनी १९७१ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाशी निष्ठावान राहिले.

राजकीय वाटचाल२०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपली जागा सोडल्याने राजकोट पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यात भाजपने रुपाणी यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आणि राजकोट पश्चिममधून आमदार झाले. त्यांना २०१४ मध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि परिवहन, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर, ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिले.

एक विचारवंत आणि स्पष्टवक्ता नेता हरपला!विजय रूपाणी हे आपल्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी आणि भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघाताची अधिकृत चौकशी सुरूसरकारकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, एअर इंडियाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटना