शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:32 IST

Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही.

ठळक मुद्देगेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये वाढला होता तणावभारत चीनदरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा झाली होती सकारात्मक

गेल्या वर्षी मे महिन्यापासूच भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर हा वाद सोडवण्यासाठी देशातील सैन्य आणि राजकीय स्तरावरही अनेक चर्चा पार पडल्या आहेत परंतु आता पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत आणि चीन आपलं सैन्य मागे परतत असल्याचा दावा चिनी प्रपोगंडा पसवणारं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं केला आहे. दरम्यान, चीनच्या या दाव्यावर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."भारत आणी चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार चीन आणि भारत बॉर्डर ट्रुप्सनं बुधावारी पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे," असा दावा ग्लोबल टाईम्सनं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं केला आहे.  सीमेवरील वातावरणाबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनच्या दरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या मध्ये असलेल्या सीमेच्या परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झालं होतं. भारतीय लष्करानंही ही बाब सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. तसंच संरक्षण मंत्रालयानंही यानंतर याबाबत माहिती देत नवव्या टप्प्यातील चर्चा सकारात्मक राहिल्याचं म्हटलं होतं. तसंच दोन्ही बाजूनं सैनिक हटवण्यावर सहमती झाली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसंच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. कडाक्याच्या थंडीतही सैनिकांची तैनातीसध्या लष्कराचे ५० हजारांपेक्षा अधिक सैनिक शून्य पेक्षाही कमी तापमानात देशाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चीननंही आपले सैनिक त्या ठिकाणी तैनात केले आहे. पँगाँग लेक आणि आसपासचा परिसर रणनितिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर भारतानं त्या ठिकाणी गस्त वाढवली होती. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख