शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:35 IST

India-China News: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान असल्याचे देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी म्हटले.

गोरखपूर: चीनबरोबर असलेल्या सीमातंटा अद्यापही मिटलेला नसून, ते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यानंतरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानने भारताविरोधात सुरू ठेवलेले छुपे युद्ध व सातत्याने तो देश काढत असलेल्या कुरापती हे आहे, असे परखड मत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी नोंदवले. 

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराला शुक्रवारी भेट देऊन चौहान यांनी तिथे देवदर्शन घेतले. त्यांनी सांगितले की, शेजारी देशातील अस्थिरतेचा परिणाम भारतावरही होत आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भावी काळात जी युद्धे लढली जातील, त्यांकरिता सज्ज राहण्याचेही आव्हान भारतापुढे आहे. भविष्यात युद्धे जमीन, हवा व पाणी यांच्याबरोबरच अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक डोमेन लढली जाणार आहेत. यासाठी भारताला सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी लागणार आहे. शत्रूंकडे (चीन आणि पाकिस्तान) अण्वस्त्रे आहेत. त्यांच्याशी पारंपरिक  किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे लढताना भारताला विविध व्यूहरचना कराव्या लागतील.

‘ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य’सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करावे, त्यासाठी कशा प्रकारे लढावे याबाबतचे सर्व निर्णय सैन्यदलांनीच घेतले. पहलगाम हल्ल्याचा सूड घेणे इतकेच ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट नव्हते; तर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पायबंदासाठी कठोर कारवाई केली.  आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान गर्भगळीत झाला व त्याने शस्त्रसंधी करण्याची विनंती केली. 

अफवांचाही मुकाबलासीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना खोट्या बातम्या दिल्या. अफवा पसरविण्याच्याही प्रयत्न झाला; पण या सगळ्या गोष्टींवर मात केली गेली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानUttar Pradeshउत्तर प्रदेशGorakhpurगोरखपूर