शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
2
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
3
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
4
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
5
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
6
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
7
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
8
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
9
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
10
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
11
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
12
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
13
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
14
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
15
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
16
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
17
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
18
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
19
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
20
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी

Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:35 IST

India-China News: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान असल्याचे देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी म्हटले.

गोरखपूर: चीनबरोबर असलेल्या सीमातंटा अद्यापही मिटलेला नसून, ते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यानंतरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानने भारताविरोधात सुरू ठेवलेले छुपे युद्ध व सातत्याने तो देश काढत असलेल्या कुरापती हे आहे, असे परखड मत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी नोंदवले. 

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराला शुक्रवारी भेट देऊन चौहान यांनी तिथे देवदर्शन घेतले. त्यांनी सांगितले की, शेजारी देशातील अस्थिरतेचा परिणाम भारतावरही होत आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भावी काळात जी युद्धे लढली जातील, त्यांकरिता सज्ज राहण्याचेही आव्हान भारतापुढे आहे. भविष्यात युद्धे जमीन, हवा व पाणी यांच्याबरोबरच अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक डोमेन लढली जाणार आहेत. यासाठी भारताला सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी लागणार आहे. शत्रूंकडे (चीन आणि पाकिस्तान) अण्वस्त्रे आहेत. त्यांच्याशी पारंपरिक  किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे लढताना भारताला विविध व्यूहरचना कराव्या लागतील.

‘ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य’सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करावे, त्यासाठी कशा प्रकारे लढावे याबाबतचे सर्व निर्णय सैन्यदलांनीच घेतले. पहलगाम हल्ल्याचा सूड घेणे इतकेच ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट नव्हते; तर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पायबंदासाठी कठोर कारवाई केली.  आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान गर्भगळीत झाला व त्याने शस्त्रसंधी करण्याची विनंती केली. 

अफवांचाही मुकाबलासीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना खोट्या बातम्या दिल्या. अफवा पसरविण्याच्याही प्रयत्न झाला; पण या सगळ्या गोष्टींवर मात केली गेली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानUttar Pradeshउत्तर प्रदेशGorakhpurगोरखपूर