शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अस्थी घेण्यासाठी कुटुंबीयांचा नकार, स्मशानभूमीबाहेर लागले ढिग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 15:32 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण होईल या भीतीने कुटुंबीय कोरोनाग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत आहेत. अशावेळी प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांचा आकडा 69 लाखांवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल एक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच काहींनी आपल्या कुटुंबीयांचे अस्थी घेण्यासाठी देखील नकार दिला आहे. 

कोरोनाची लागण होईल या भीतीने कुटुंबीय कोरोनाग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत आहेत. अशावेळी प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तसेच नातेवाईक अस्थी घेण्यासाठी देखील स्मशानभूमीत येत नाहीत. गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 900 लोकांच्या अस्थी अद्यापही स्मशानभूमीत पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अस्थिंचा ढीग लागला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये 450 आणि भरूचमध्ये 200 कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच आले नाही.

स्मशानभूमीत अस्थिंचा ढीग

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय आणि प्रशासनाच्या वतीने अशा लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच नवसारीमध्ये 222, अंकलेश्वरमध्ये 210 आणि जामनगरमध्ये 160 मृतकांची अस्थी घेण्यासाठी कोणी आलेलं नाही. सुरेंद्रनगर येथील स्मशानभूमीत अस्थिंचा ढीग लागला आहे कोरोनाच्या भीतीने नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. अनेक ठिकाणी तर या अस्थी डम्पिंग ग्राऊंडवर फेकण्यात येत आहे.

अस्थी घेण्यासाठी कुटुंबीयांचा नकार

जामनगरमध्ये स्मशान समितीचे सदस्य दर्शन ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनगरमधील स्मशानभूमीत 387 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यापैकी 80 टक्क्यांहून जास्त मृतकांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी आले नाही. याशिवाय अहमदबादमध्ये आतापर्यंत 1812 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यामध्ये 450 मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आले नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर त्याच्या शरीरातील कोरोनाचे अंश पूर्णपणे नाहीसे होतात. अशात अस्थी आणि राखेपासून भीती नाही. मात्र असे असतानाही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूGujaratगुजरातdoctorडॉक्टर