शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सरदार पटेल जयंती; कंगनाच्या ट्विटने सर्वांना केले हैराण; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 14:24 IST

"आपण एका पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो."

नवी दिल्ली - बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौतने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट अत्यंत वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. सरदार पटेलांच्या जयंती निमित्त कंगनाने असे काही लिहिले आहे, की ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. पटेलांच्या जयंती निमित्त कंगनाने त्यांना अभिवादन केले. याच बरोबर तिने, आपल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहर लाल नेहरू यांच्यावरही टीका केली आहे.

कंगनाने ट्विट करत लिहिले, "त्यांनी गांधींना खूश करण्यासाठी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या स्वरुपात, आपल्या सर्वात योग्य आणि निवडलेल्या पदाचे बलिदान दिले. कारण नेहरू चांगले इंग्रजी बोलतात, असे गांधींना वाटत होते. यामुळे सरदार पटेलांना नाही, तर संपूर्ण देशालाच अनेक दशके नुकसान सोसावे लागले. ज्यावर आपला अधिकार आहे, ते आपण कसल्याही प्रकारची लाज न बाळगता घ्यायला हवे."

यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले, यात कंगनाने म्हटले आहे, 'ते भारताचे खरे लोहपुरुष आहेत. गांधीजींनाही नेहरूंप्रमाणेच एक कमकुवत बुद्धी असलेली व्यक्ती हवी होती. जेनेकरून त्यांना त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवता येईल आणि नेहरूंना समोर करून निर्णय घेता येतील. ही एक चांगली योजना होती. मात्र, गांधी जी गेल्यानंतर जे झाले ती मोठी आपत्ती होती. #SardarVallabhbhaiPatel.'  

आणखी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली, 'भारताचे लौह पुरुष सरदार पटेल यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करते. आपण एक असे व्यक्ती होतात, ज्यांनी अम्हाला आजचा भारत दिला. मात्र, आपण एका पंतप्रधान पदाला नकार देऊन, आमच्या महान नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला आमच्यापासून दूर केले. आम्हाला आपल्या निर्णयाबद्दल अत्यंत खेद वाटतो.'

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडMahatma Gandhiमहात्मा गांधी