शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 19:48 IST

कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या तिच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती.

कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद आणखीनच वाढत चालला आहे. भिकेत स्वातंत्र्य मिळाल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी ट्विट करत निशाणा साधला होता. आता कंगनाने यावर पलटवार केला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वरुण गांधींचे ट्विट पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. यावर तिने लिहिले आहे की, गांधींना स्वातंत्र्य भिकेत मिळाले होते. जा आता आणखी रडा. कंगनाच्या या वक्तव्याने अनेक लोक दुखावले गेले आहेत. तिचे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. (Kangana Ranaut reacts on Varun Gandhi tweet)

कंगनानं व्यक्त केला राग -कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या तिच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. वरुण यांचे हे ट्विट कंगनाने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, 'मी स्पष्टपणे बोलले होते, की 1857 ची क्रांती नियंत्रित करण्यात आली होती. यामुळे ब्रिटीश शासनाकडून अधिक अत्याचार आणि क्रूरता केली गेली आणि जवळपास शतकानंतर आपल्याला स्वातंत्र्य दिले गेले, तिही गांधींच्या भिकेत. जा आता आणखी रडा.'

काय म्हणाली होती कंगना -टाईम्स नाऊ समिटमध्ये बोलताना कंगना रणौत म्हणाली होती, काँग्रेसचे राज्य हे ब्रिटीश राजवटीचेच एक पुढचे रूप होते आणि देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. तिचा इशारा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याकडे होता. एवढेच नाही, तर 1947 मध्ये देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळाले, असेही तिने म्हटले होते.

वरुण गांधींनी केले होते असे ट्विट -कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांची हत्या करणाऱ्यांचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंपासून ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला होता. 

आणखी वाचा - 

याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी

ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतVarun Gandhiवरूण गांधीbollywoodबॉलिवूड