शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Viral Video: "दातं आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
6
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
7
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
8
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
10
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
11
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
12
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
13
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
14
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
15
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
17
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
18
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
19
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
20
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार

बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:25 IST

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या ५४ योजनांचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय, नीती आयोगाकडूनही २६० केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेणे सुरू आहे. ३१४ योजनांचा फायदा नागरिकांना किती होत आहे हे ३१ मार्च २०२६ पर्यंत समोर न आल्यास त्या पुढे चालू ठेवण्याची शिफारस केंद्र सरकार करणार नाही. यापैकी बहुतेक योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे. लाभार्थ्यांची कठोर छाननी करून आणि बोगस लाभार्थींना काढून टाकल्यानंतर त्यांनी आधीच ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे ही छाननी पुढेही अशीच सुरूच राहणार आहे.

२.८९ लाख कोटी रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारचे खर्च होत आहेत.

सरकार असे वाचवतेय पैसे

सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठविणे तसेच अधिक परिणाम मिळावा यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यावर भर दिला आहे. यामुळे पैशांची बचत होत आहे.

केंद्राच्या प्रमुख योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी)

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान

मनरेगावर येणार मर्यादा

आश्चर्याची बाब म्हणजे, संपूर्णपणे केंद्र सरकार निधी देत असलेल्या ५४ योजनांचे मूल्यांकन संबंधित मंत्रालये आणि विभागांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘थर्ड पार्टी’कडून केले जाणार आहे. त्यामुळे लोकांकडून मागणी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनांवरही (मनरेगा) काही मर्यादा येणार आहेत.

इतर २६० केंद्र पुरस्कृत अंशतः निधी असलेल्या योजनांचे मूल्यांकन नीती आयोगातील डीईएमओद्वारे होईल. ३१ मार्च २०२६ पूर्वी योजनांचे मूल्यांकन करायचे आहे.

...तरच योजना सुरू राहणार

अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की योजनांनी त्यांचे निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यात किती यश आले हे सिद्ध करावे लागणार आहे. जर त्यांनी हे सिद्ध केले तरच त्या योजना चालू राहतील. 

प्रत्येक योजना बंद करण्याची एक तारीख असावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, एखाद्या योजनेच्या बदल्यात कमी खर्चात आणखी एक पर्यायी योजना सादर करण्याचाही पर्याय सरकारने मांडला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी