शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:25 IST

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या ५४ योजनांचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय, नीती आयोगाकडूनही २६० केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेणे सुरू आहे. ३१४ योजनांचा फायदा नागरिकांना किती होत आहे हे ३१ मार्च २०२६ पर्यंत समोर न आल्यास त्या पुढे चालू ठेवण्याची शिफारस केंद्र सरकार करणार नाही. यापैकी बहुतेक योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे. लाभार्थ्यांची कठोर छाननी करून आणि बोगस लाभार्थींना काढून टाकल्यानंतर त्यांनी आधीच ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे ही छाननी पुढेही अशीच सुरूच राहणार आहे.

२.८९ लाख कोटी रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारचे खर्च होत आहेत.

सरकार असे वाचवतेय पैसे

सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठविणे तसेच अधिक परिणाम मिळावा यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यावर भर दिला आहे. यामुळे पैशांची बचत होत आहे.

केंद्राच्या प्रमुख योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी)

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान

मनरेगावर येणार मर्यादा

आश्चर्याची बाब म्हणजे, संपूर्णपणे केंद्र सरकार निधी देत असलेल्या ५४ योजनांचे मूल्यांकन संबंधित मंत्रालये आणि विभागांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘थर्ड पार्टी’कडून केले जाणार आहे. त्यामुळे लोकांकडून मागणी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनांवरही (मनरेगा) काही मर्यादा येणार आहेत.

इतर २६० केंद्र पुरस्कृत अंशतः निधी असलेल्या योजनांचे मूल्यांकन नीती आयोगातील डीईएमओद्वारे होईल. ३१ मार्च २०२६ पूर्वी योजनांचे मूल्यांकन करायचे आहे.

...तरच योजना सुरू राहणार

अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की योजनांनी त्यांचे निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यात किती यश आले हे सिद्ध करावे लागणार आहे. जर त्यांनी हे सिद्ध केले तरच त्या योजना चालू राहतील. 

प्रत्येक योजना बंद करण्याची एक तारीख असावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, एखाद्या योजनेच्या बदल्यात कमी खर्चात आणखी एक पर्यायी योजना सादर करण्याचाही पर्याय सरकारने मांडला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी