शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळुरुत हाय अलर्ट, मारेक-यांचा शोध घेण्यासाठी शहरभर नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:26 IST

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. सावधगिरी म्हणून सर्व महत्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहेशहरात येणा-या आणि शहरातून जाणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहेमुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेतपोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत

बंगळुरु, दि. 6 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेक-यांना पकडण्याचं मोठं आव्हान कर्नाटक पोलिसांसमोर आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. सावधगिरी म्हणून सर्व महत्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करणा-या सर्व टोलनाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून शहरात येणा-या आणि शहरातून जाणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

'मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व चेकपोस्टवर लोक आणि वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. आंतरराज्यीय सीमांवरही आमचं लक्ष आहे', अशी माहिती पोलीस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली आहे. 'आम्ही शेजारी राज्य आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूलाही यासंबंधी अलर्ट दिला आहे', असं एम एन अनुचेत यांनी सांगितलं आहे. 

पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असून एका सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली असून त्याच्यावर पोलिसांना संशय आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, तसंच अंगावर काळे कपडे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी परिसरातील मोबाईल टॉवरचीही तपासणी सुरु केली. तीन मोबाईल टॉवरची तपासणी सुरु असून त्यांचा डाटा गोळा केला जात आहे.  

मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. 

केंद्रीय मंत्री स्मतृी इराणी यांनी हत्येचा निषेध करत लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली आहे. 

55 वर्षीय गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 

गौरी यांच्याविरोधात गतवर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजपा खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशCrimeगुन्हाPoliceपोलिसGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणMurderखून