शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

खरीप पिकांवरही आता काळ्या म्हशींचा हल्ला जमिनीला भेगा पडल्याचा परिणाम

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.
गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पिकांची मुळे उघडी पडली असून, त्यावर किडींनी हल्ला चढविला आहे. आधीच पावसाअभावी कोमेजले असलेल्या पिकांची अवस्था या किडींमुळे भयंकर झाली असून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे व भारी पावसाची वारंवारिता अत्यंत कमी असल्यामुळे जमिनीतील किडी फोफावण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. जमिनीतील किडींमध्ये सर्वसाधारण वाणी, जमिनीवरचे नाकतोडे, क्रिक्रेट, गोनोसेफॅलम भुंगा यांचा समावेश होतो. गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याला ग्रामीण भागात काळी म्हैस म्हणून ओळखतात. ही जमिनीत सक्रिय असलेली कीड असून, मुख्यत: पिकांच्या अवशेषांवर जगते. मात्र, खाद्याची कमतरता जाणवल्यावर भुंगे व अळ्या भुईमूग, हरभरा, सोयाबीन, कापूस, सुर्यफूल, ज्वारी, मूग, मका आदी पिकांवर हल्ला करतात. ही किडी बहुभक्षी असून, जमिनीत पेरलेले बियाणे व रोपटे यांच्यावर हल्ला करतात. तणयुक्त पडीक जमीन, ज्वारीसह गवतवर्गीय तणे यावर ही कीड जगते. पेरणीनंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात होते. त्यामुळे नुकतेच उगवलेल्या रोपांची मुळे उघडे पडतात. या परिस्थितीत पिकांना या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जोरदार पाऊस झाल्यास ही कीड जमिनीत दबून नष्ट होते.

----------- बॉक्स ------------
..... असे करा व्यवस्थापन
पेरलेल्या ओळीवर वजन देऊन माती झाकावी म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
कुजत असलेले सेंद्रिय पदार्थ विशेषत: पूर्वीच्या पिकांचे अवशेष किंवा गाई, म्हशी व शेळ्यांचे मल, जमिनीची पूर्व मशागत ज्याद्वारे जमिनीत पिकाचे अवशेष राहतात, अशा बाबी या किडीच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे पिकांचे संेद्रिय पदार्थांचे ढीग शेतात लावून ठेवू नये व हंगामापूर्वी त्याची विल्हेवाट लावावी.

फोटो : 07 सीटीसीएल 27