शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

खरीप पिकांवरही आता काळ्या म्हशींचा हल्ला जमिनीला भेगा पडल्याचा परिणाम

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.
गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पिकांची मुळे उघडी पडली असून, त्यावर किडींनी हल्ला चढविला आहे. आधीच पावसाअभावी कोमेजले असलेल्या पिकांची अवस्था या किडींमुळे भयंकर झाली असून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे व भारी पावसाची वारंवारिता अत्यंत कमी असल्यामुळे जमिनीतील किडी फोफावण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. जमिनीतील किडींमध्ये सर्वसाधारण वाणी, जमिनीवरचे नाकतोडे, क्रिक्रेट, गोनोसेफॅलम भुंगा यांचा समावेश होतो. गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याला ग्रामीण भागात काळी म्हैस म्हणून ओळखतात. ही जमिनीत सक्रिय असलेली कीड असून, मुख्यत: पिकांच्या अवशेषांवर जगते. मात्र, खाद्याची कमतरता जाणवल्यावर भुंगे व अळ्या भुईमूग, हरभरा, सोयाबीन, कापूस, सुर्यफूल, ज्वारी, मूग, मका आदी पिकांवर हल्ला करतात. ही किडी बहुभक्षी असून, जमिनीत पेरलेले बियाणे व रोपटे यांच्यावर हल्ला करतात. तणयुक्त पडीक जमीन, ज्वारीसह गवतवर्गीय तणे यावर ही कीड जगते. पेरणीनंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात होते. त्यामुळे नुकतेच उगवलेल्या रोपांची मुळे उघडे पडतात. या परिस्थितीत पिकांना या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जोरदार पाऊस झाल्यास ही कीड जमिनीत दबून नष्ट होते.

----------- बॉक्स ------------
..... असे करा व्यवस्थापन
पेरलेल्या ओळीवर वजन देऊन माती झाकावी म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
कुजत असलेले सेंद्रिय पदार्थ विशेषत: पूर्वीच्या पिकांचे अवशेष किंवा गाई, म्हशी व शेळ्यांचे मल, जमिनीची पूर्व मशागत ज्याद्वारे जमिनीत पिकाचे अवशेष राहतात, अशा बाबी या किडीच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे पिकांचे संेद्रिय पदार्थांचे ढीग शेतात लावून ठेवू नये व हंगामापूर्वी त्याची विल्हेवाट लावावी.

फोटो : 07 सीटीसीएल 27