शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:11 IST

महाराष्ट्र, हरयाणातील निकालाचा फटका

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या ‘बिहार आणि दिल्ली मिशनवर’ परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजप आपल्या प्रभावाच्या बळावर जेडीयूवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत होती. दिल्लीतही आम आदमी पार्टीविरुद्ध आक्रमक मोहीम उभारण्याची तयारी सुरू होती. तथापि, महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर या दोन्ही राज्यांसाठी भाजपला आता आपल्या रणनीतीत बदल करावा लागू शकतो. या दोन्ही राज्यांत पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सूत्रांनुसार भाजप महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्ये मित्रपक्ष जेडीयूवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात होती. सरकारमध्ये वरचश्मा राखण्यासाठी भाजपच्या जागा वाढवून घ्याव्यात, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यानंतर जेडीयूने प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली होती. तथापि, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

परंतु जाणकारांनुसार भाजप बिहारमध्ये आपला दबदबा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामधील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आपला हा बेत तूर्त स्थगित करून योग्य वेळेची वाट पाहणे पसंत करील. जेणेकरून अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागू नये.

भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान दिल्लीत सरकार स्थापन करण्याचे आहे. दिल्ली देशाची राजधानी असून, भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा तिथे वावर असतो. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजपला आव्हान देत असतात. दिल्ली आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने संघर्ष होताना दिसतो.

नव्याने आखावी लागणार रणनीती

दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा बेत आहे; परंतु महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर केजरीवाल सरकारचे मनोबल उंचावले आहे.भाजपच्या रणनीतीकारांनाही असे वाटते की, केजरीवाल निवडणूक प्रचारात या दोन राज्यांतील भाजपच्या स्थितीचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवतील. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नव्याने रणनीती आखावी लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा