शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:11 IST

महाराष्ट्र, हरयाणातील निकालाचा फटका

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या ‘बिहार आणि दिल्ली मिशनवर’ परिणाम होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजप आपल्या प्रभावाच्या बळावर जेडीयूवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत होती. दिल्लीतही आम आदमी पार्टीविरुद्ध आक्रमक मोहीम उभारण्याची तयारी सुरू होती. तथापि, महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर या दोन्ही राज्यांसाठी भाजपला आता आपल्या रणनीतीत बदल करावा लागू शकतो. या दोन्ही राज्यांत पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सूत्रांनुसार भाजप महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्ये मित्रपक्ष जेडीयूवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात होती. सरकारमध्ये वरचश्मा राखण्यासाठी भाजपच्या जागा वाढवून घ्याव्यात, अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यानंतर जेडीयूने प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली होती. तथापि, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

परंतु जाणकारांनुसार भाजप बिहारमध्ये आपला दबदबा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामधील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आपला हा बेत तूर्त स्थगित करून योग्य वेळेची वाट पाहणे पसंत करील. जेणेकरून अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागू नये.

भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान दिल्लीत सरकार स्थापन करण्याचे आहे. दिल्ली देशाची राजधानी असून, भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा तिथे वावर असतो. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजपला आव्हान देत असतात. दिल्ली आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने संघर्ष होताना दिसतो.

नव्याने आखावी लागणार रणनीती

दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा बेत आहे; परंतु महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणूक निकालानंतर केजरीवाल सरकारचे मनोबल उंचावले आहे.भाजपच्या रणनीतीकारांनाही असे वाटते की, केजरीवाल निवडणूक प्रचारात या दोन राज्यांतील भाजपच्या स्थितीचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवतील. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नव्याने रणनीती आखावी लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा