शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 09:09 IST

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे 2014 च्या महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत 15 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी 280 कोटी रुपये प्रचारासाठी वापरले आहेत.विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR)) या संस्थेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जमा-खर्चाचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला.

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. देशातील दोन्ही प्रमुख पक्ष असलेले भाजपाकाँग्रेसने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 2014 पर्यंत या दोन्ही राज्यांची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. मात्र यानंतर आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून राज्ये निसटत गेली. मागील पाच वर्षांपासून दोन्ही राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. आता परत एकदा महाराष्ट्र व हरियाणामध्ये भाजपाला धक्का देत काँग्रेस सत्तेवर येणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 2014 च्या महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत 15 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी 280 कोटी रुपये प्रचारासाठी वापरले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR)) या संस्थेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जमा-खर्चाचा अहवाल गुरुवारी (10 ऑक्टोबर) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आणि त्यांनी तो कसा खर्च केला याबाबात माहिती देण्यात आली आहे. 2014 च्या महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी 15 राजकीय पक्षांना 464.55 कोटींचा निधी मिळाला होता. त्यापैकी 357.21 कोटी रुपये पक्षांनी खर्च केले. 

भाजपाला यामध्ये सर्वाधिक म्हणजे 296.74 कोटींचा निधी मिळाला होता. त्यापैकी 217.68 खर्च करण्यात आले. तर काँग्रेसने 84.37 कोटींपैकी 55.27 कोटी खर्च केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने 41 कोटी, शिवसेनेने 17.94 कोटी खर्च केल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजकीय पक्षांनी विविध माध्यमांवरील जाहिरातींसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यासाठी 245.22 कोटी खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा या दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे; तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारराजाने दिलेला कौल धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येलाच निकालाच्या स्वरूपात जाहीर होईल आणि ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर नवे सरकार सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला असेल. राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पुन्हा संधी देणार की, 2014 प्रमाणे राज्यात सत्तांतर घडवून आणणार, याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसHaryanaहरयाणाShiv Senaशिवसेना