शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 15:33 IST

Farmers Protest: या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली:दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र, याच ठिकाणी भाजप आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. (bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते अमित वाल्मिकी यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. वाल्मिकी यांनी कौशंबी पोलीस स्थानकात केलेल्या लिखित तक्रारीत, भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही; कृषी कायद्यात बदल आवश्यकच”

भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांत हाणामारी

गेल्या सात महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहचल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत. सकाळी गाझीपूर सीमेवर भाजप कार्यकर्ते दाखल झाले. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने मारहाण झाली. गोंधळाची बातमी मिळताच प्रचंड पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. 

“कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

भाजप नेते अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर कार्यकर्ते उभे होते. कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी व्यासपीठासमोर पोहोचला तेव्हा शेतकरी आणि भाजपमध्ये चकमक सुरू झाली. या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!

दरम्यान, 'भाकियू'च्या वतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 'भाकियू'चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांना या मंचावर कब्जा करायचा आहे. हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून येथे येत आहेत आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच पुन्हा आमच्या मंचावर दिसलात तर याद राखा, असा थेट इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण