शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Farmers Protest: मोठी कारवाई! गाझीपूर बॉर्डर झटापट प्रकरणी BKU च्या २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 15:33 IST

Farmers Protest: या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली:दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र, याच ठिकाणी भाजप आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय किसान युनियनच्या (BKU) २०० कार्यकर्त्यांविरोधात FIR नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. (bjp workers farm law protesters clash ghazipur police registered fir on 200 bku workers)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते अमित वाल्मिकी यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. वाल्मिकी यांनी कौशंबी पोलीस स्थानकात केलेल्या लिखित तक्रारीत, भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही; कृषी कायद्यात बदल आवश्यकच”

भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांत हाणामारी

गेल्या सात महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहचल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत. सकाळी गाझीपूर सीमेवर भाजप कार्यकर्ते दाखल झाले. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने मारहाण झाली. गोंधळाची बातमी मिळताच प्रचंड पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. 

“कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

भाजप नेते अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर कार्यकर्ते उभे होते. कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी व्यासपीठासमोर पोहोचला तेव्हा शेतकरी आणि भाजपमध्ये चकमक सुरू झाली. या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!

दरम्यान, 'भाकियू'च्या वतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 'भाकियू'चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांना या मंचावर कब्जा करायचा आहे. हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून येथे येत आहेत आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच पुन्हा आमच्या मंचावर दिसलात तर याद राखा, असा थेट इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण