शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:00 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र...

भोपाळ - पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला.  राज्यातीली 29 पैकी 28 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेला विजय राज्यातील अस्थिर सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचा एक आमदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडणून आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे संख्याबळ एकने घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, विधानसभेची सदस्यसंख्याही एकने घटून 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांसाठी काँग्रेसची सत्ता स्थिर झाली आहे. रतलाम येथील भाजपा खासदार जी. एस. दामोह यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले होते. आता दामोह हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ एकने घटून 108 वर घसरणार आहे. नव्या सदस्याची नियुक्ती होईपर्यंत विधानसभेतील सदस्यसंख्या 229 एवढीच राहणार आहे. त्यामुळे 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला काही काळासाठी का होईना आपोआप स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  भाजपा नेते सीताराम शर्मा आणि माजी मुख्य सचिव भगवानदास सांगतात की विधानसभेत सध्या 229 एवढी सदस्यसंख्या असल्याने काँग्रेसकडे पूर्ण बहुमत झाले आहे. तर आम्हाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आहे, असे राज्यातील कमलनाश सरकारची घटिका भरत आली आहे, असा वारंवार दावा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी सांगितले.  दामोह यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील घटणाऱ्या संख्याबळाबाबत विचारले असता भाजपा नेते सीताराम शर्मा यांनी आम्ही याबाबत विचारच केला नव्हता, असे उत्तर दिले. तसेच राज्यातील कमलनाश सरकार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल