शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:00 IST

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र...

भोपाळ - पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला.  राज्यातीली 29 पैकी 28 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेला विजय राज्यातील अस्थिर सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचा एक आमदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडणून आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे संख्याबळ एकने घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, विधानसभेची सदस्यसंख्याही एकने घटून 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांसाठी काँग्रेसची सत्ता स्थिर झाली आहे. रतलाम येथील भाजपा खासदार जी. एस. दामोह यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले होते. आता दामोह हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ एकने घटून 108 वर घसरणार आहे. नव्या सदस्याची नियुक्ती होईपर्यंत विधानसभेतील सदस्यसंख्या 229 एवढीच राहणार आहे. त्यामुळे 115 सदस्य असलेल्या काँग्रेसला काही काळासाठी का होईना आपोआप स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  भाजपा नेते सीताराम शर्मा आणि माजी मुख्य सचिव भगवानदास सांगतात की विधानसभेत सध्या 229 एवढी सदस्यसंख्या असल्याने काँग्रेसकडे पूर्ण बहुमत झाले आहे. तर आम्हाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आहे, असे राज्यातील कमलनाश सरकारची घटिका भरत आली आहे, असा वारंवार दावा करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी सांगितले.  दामोह यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील घटणाऱ्या संख्याबळाबाबत विचारले असता भाजपा नेते सीताराम शर्मा यांनी आम्ही याबाबत विचारच केला नव्हता, असे उत्तर दिले. तसेच राज्यातील कमलनाश सरकार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल