शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार माणसं मिळणार नाहीत, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 09:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते...

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 2019नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. चौबे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अश्विनी चौबे यांनी बाबतपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनी 15 मिनिटे बोलण्याची संधी देण्याच्या मोदींना दिलेल्या आव्हानावरून राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल. तर काँग्रेस चारीमुंड्या चीत होईल. त्यानंतर काँग्रेस पक्षाला स्मशानात घेऊन जाण्यासाठीही चार जण मिळणार नाहीत."

राहुल गांधी यांनी गरिबी पाहिलेली नाही. तसेच राहुल गांधींच्या खानदानाने महिलांचे किती शोषण केले आहे ते सुद्धा त्यांना ठावूक नाही आहे, असा टोलाही चौबे यांनी यावेळी लगावला.  चौबे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, वाराणसी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौबे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.   

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेसPoliticsराजकारण